शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी भरले, वीज जोडणी नाही

By admin | Updated: June 18, 2016 00:46 IST

विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणेबाबतच्या योजनेतून कृषी विभागाने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना कृषी पंप वाटप केले.

दोन वर्षे उलटली : अडीच हजारांवर आदिवासी शेतकरी सिंचन सुविधेच्या प्रतीक्षेतचदिलीप दहेलकर गडचिरोलीविदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविणेबाबतच्या योजनेतून कृषी विभागाने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना कृषी पंप वाटप केले. त्यानंतर वीज जोडणीसाठी डिमांडच्या स्वरूपात महावितरणकडे २ कोटी १ लाख रूपये ९१ हजार रूपये अदा केले . मात्र गेल्या दोन वर्षांपासून तब्बल २ हजार ५१४ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्यात आली नाही. परिणामी या शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. याच कार्यालयामार्फत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी पंप वाटप व कृषी जोडणीची योजना हाती घेण्यात आली आहे. कृषी विभागाने सन २०१३-१४ मध्ये या योजनेंतर्गत १ हजार ३७५ व सन २०१४-१५ मध्ये १ हजार ९१७ असे एकूण ३ हजार २९२ लाभार्थ्यांना कृषी पंप व वीज जोडणीसाठी पात्र ठरविले. यापैकी महावितरणने केवळ ७७८ शेतकरी लाभार्थ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी दिली आहे. तसा अहवाल महावितरणकडून जानेवारी २०१६ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. कृषी विभागाने १ हजार ९१७ लाभार्थ्यांच्या कृषी पंपांच्या जोडणीसाठी १ कोटी ३५ लाख ९० हजार व १ हजार ३७५ लाभार्थ्यांचे ६६ लाख असे एकूण २ कोटी १ लाख ९१ हजार रूपये डिमांडच्या स्वरूपात महावितरणाकडे वर्ग केले आहे. मात्र कृषी पंपांना वीज जोडणी देण्याच्या कामात गती नसल्याचे दिसून येते. कृषी विभागाच्या वतीने आदिवासी शेतकरी लाभार्थ्यांना १०० सवलतीवर कृषी पंप व वीज जोडणी देण्याची ही योजना आहे. या संदर्भात गडचिरोली वीज वितरण विभागाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अशोक मस्के यांना विचारणा केली असता, याबाबतची सविस्तर माहिती दोन दिवसानंतर देतो, असे त्यांनी लोकमतला सांगितले. कृषी विभागाकडून अनेकदा पाठपुरावाविदर्भ विकास कार्यक्रमाच्या योजनेतून कृषी पंप वितरित केलेल्या आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याची कार्यवाही महावितरणने लवकर करावी, याकरिता कृषी विभागाने महावितरणच्या कार्यालयाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. मात्र महावितरणकडून कृषी पंपाच्या वीज जोडणीत अनेक अडचणी पुढे केल्या जात आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामात उपयोग होणार काय?कृषी पंपाना वीज जोडणी देण्यात महावितरणकडून प्रचंड दिरंगाई होत आहे. यंदाचा खरीप हंगामाला सुरूवात झाली असून शेतकरी बी-बियाणे खरेदीच्या कामात लागला आहे. यावर्षी धान पिकाच्या लागवडीनंतर समाधानकारक पाऊस न झाल्यास आदिवासी शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या साहाय्याने शेतीला पाणी पुरवठा करावा लागणार नाही. मात्र खरीप हंगामातील पीक अंतिम टप्प्यात येईपर्यंत महावितरणकडून उर्वरित अडीच हजारवर लाभार्थ्यांच्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याचे काम पूर्ण होईल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या चकराकृषी विभागाकडून शासकीय योजनेतून कृषी पंप मिळालेल्या शेतकऱ्यांनी आज ना उद्या महावितरणकडून कृषीपंपाला वीज जोडणी करून देण्यात येईल, अशी आशा केली होती. मात्र वर्ष, दोन वर्षाचा कालावधी उलटूनही महावितरणकडून वीज जोडणीचा पत्ता नसल्याने अनेक लाभार्थी शेतकरी महावितरणच्या कार्यालयात चकरा मारीत असल्याचे दिसून येते.