शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

कोतवाल पदाची लावली दोनदा यादी

By admin | Updated: June 14, 2014 02:16 IST

कोतवाल पदाची तोंडी व लेखी परीक्षा घेण्यात आली.

एटापल्ली : कोतवाल पदाची तोंडी व लेखी परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांचे गुण असलेली यादी दोनदा लावण्यात आल्याने ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला असून या परीक्षेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. तोंडी परीक्षा घेतल्यानंतर १३ जून रोजी कोतवाल पद भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला. या यादीत तोंडी व लेखी गुणांचा समावेश होता. सकाळी ९ वाजता लावण्यात आलेल्या यादीत सतिश हरिदास दुर्गे रा. तोडसा याला ४२ गुण दाखविण्यात आले होते. ही यादी फाडून टाकून दुपारी २ वाजता दुसरी यादी लावण्यात आली. या यादीत सतिश दुर्गेला ६० गुण देण्यात आले. पहिल्या व दुसऱ्या यादीत गुणांमध्ये फरक असल्याचे लक्षात येताच उमेदवारांमध्ये एकच गोंधळ उडाला. या भरतीत घोळ झाला असल्याचा आरोप करून या परीक्षेची सखोल चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून कुंदन दुर्गे, लुला तलांडे, जीवन तलांडे, सुमित्रा चांदेकर, वैशाली सोनटक्के, अजय कांबळे, सुरेश डोंगरे, तुळशिराम पुंगाटी, हरिदास दुर्गे यांनी केली. पं. स. सदस्य दिलीप कुलसंगे, युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष अलेश्वर गादेवार उपस्थित होते.उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्यासोबत या संपूर्ण उमेदवारांनी चर्चा केली असता, जितेंद्र पाटील यांनी तांत्रिक चुक झाल्याचे सांगितले. मात्र ही चुक लिखित स्वरूपात लिहून द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी लावून धरली असता, पाटील यांनी लेखी लिहून दिले. त्याचबरोबर लेखी व तोंडी परीक्षेवर मी स्वत: नियंत्रण ठेवले. त्यामुळे घोळ झाला नसल्याचे सांगितले. काही उमेदवारांनी खोटे रहिवासी प्रमाणपत्र जोडून परीक्षा दिली असल्याचा आरोपही तुळशिराम पुंगाटी यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)