शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

वन्यजीव गणना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:58 IST

वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.

ठळक मुद्देपाणवठे आटले : वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केली जाते मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.मोहफुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात जंगलांना आगी लागण्यास सुरुवात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गवत सुकले होते. परिणामी जंगलांना लागणाऱ्या आगीमध्ये वाढ झाली आहे. जंगलातील पाणवठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र यावर्षी तलावातील पूर्ण पाणी शेतीसाठी वापरल्या गेल्याने बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ मचान लावून पशु गणना केली जाते. मात्र पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याने वन्यजीव तलावाकडे येणार नाही. त्यामुळे वन्यजीवांची गणना कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.जंगलाची तोड थांबावी, यासाठी वन विभागाने नागरिकांना सिलिंडर गॅसचे वाटप केले आहे. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे दिसून येत नाही. ज्या नागरिकांकडे गॅस आहे, ते नागरिक सुद्धा अजूनही जंगलातील सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत असल्याने जंगलाची तोड थांबली नाही. पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरत आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ फेब्रुवारी रोजी वैरागडजवळील तलावात वन्यजीवाची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. यामध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग फारसा गंभीर झाला नसल्याने वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण सुरूच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.