शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

वन्यजीव गणना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 22:58 IST

वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.

ठळक मुद्देपाणवठे आटले : वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केली जाते मोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैशाख पौर्णिमेच्या रात्री सर्वाधिक प्रकाश राहत असल्याने यादिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ वन्यजीवांची गणना केली जाते. मात्र पाणवठेच आटल्याने वन्यजीव पाणवठ्यांकडे फिरकणार नाही. परिणामी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी होणारी गणना अडचणीत आली आहे.मोहफुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात जंगलांना आगी लागण्यास सुरुवात होते. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गवत सुकले होते. परिणामी जंगलांना लागणाऱ्या आगीमध्ये वाढ झाली आहे. जंगलातील पाणवठे आटल्यानंतर वन्यजीव गावाजवळच्या तलावात पाणी पिण्यासाठी येतात. मात्र यावर्षी तलावातील पूर्ण पाणी शेतीसाठी वापरल्या गेल्याने बहुतांश तलाव कोरडे पडले आहेत. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी वनविभागाच्या मार्फत पाणवठ्यांजवळ मचान लावून पशु गणना केली जाते. मात्र पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याने वन्यजीव तलावाकडे येणार नाही. त्यामुळे वन्यजीवांची गणना कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे.जंगलाची तोड थांबावी, यासाठी वन विभागाने नागरिकांना सिलिंडर गॅसचे वाटप केले आहे. मात्र त्याचा अपेक्षित परिणाम झाला असल्याचे दिसून येत नाही. ज्या नागरिकांकडे गॅस आहे, ते नागरिक सुद्धा अजूनही जंगलातील सरपण आणून चुलीवर स्वयंपाक करीत असल्याने जंगलाची तोड थांबली नाही. पाणवठे आटल्याने वन्यजीव पाण्याच्या शोधात फिरत आहेत. त्यामुळे त्यांची शिकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. १ फेब्रुवारी रोजी वैरागडजवळील तलावात वन्यजीवाची शिकार करण्यासाठी विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. यामध्ये एका व्यक्तीला प्राण गमवावा लागला. त्यानंतरही वन विभाग फारसा गंभीर झाला नसल्याने वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण सुरूच आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.