शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
2
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
3
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
4
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
5
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
6
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
7
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
8
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
9
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
10
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
11
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
12
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
13
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
14
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
15
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
16
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
17
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
18
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
19
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड

मासेमारी व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:18 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने तलावांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यामुळे मच्छीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देतलावांमध्ये अल्प जलसाठा : मत्स्यपालन सहकारी संस्थांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने तलावांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यामुळे मच्छीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९३ मच्छीपालन सहकारी संस्था आहेत. आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी व देसाईगंज तालुक्यातील मच्छीपालन संस्था पारंपरिक पध्दतीने मच्छीमारी करणाºया ढिवर समाजाकडे कायम आहेत. मात्र पेसा अंतर्गत गावांमधील तलाव व बोड्यांची मालकी संबंधित गावाकडे गेल्याने मच्छीपालन संस्थांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला मच्छीबीज टाकले जाते. सदर मच्छी मोठी झाल्यानंतर सर्वसाधारपणे उन्हाळ्यात मासेमारी केली जाते. मात्र यावर्षी तलाव, बोड्यांमध्ये अल्पसाठा आहे. धान पिकासाठी हा पाणीसाठा वापरला जात आहे. परिणामी सदर तलाव, बोड्या डिसेंबर जानेवारी महिन्यातच कोरड्या पडण्याची शक्यता आहे. परिणामी याच महिन्यात मासेमारी करावी लागणार आहे. या कालावधीत मासे पूर्ण वाढ झालेले राहत नसल्याने त्यांचे वजन कमी राहते. याचा फार मोठा फटका संबंधित संस्थांना बसणार आहे. काही संस्थांचा खर्चही भरून निघणे कठीण होणार आहे. वनहक्क कायद्यानुसार तलावांमध्ये अधिकार संबंधित गावांकडे दिले आहेत. यातील काही तलाव व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिले आहेत. काही तलावांमध्ये मासेमारी होत नाही. परिणामी मागील काही दिवसांपासून मत्स्यपालनात कमालीची घट झाली आहे.सहकारी संस्थांकडे पेसातील तलाव द्यापेसा कायद्यानुसार गावाच्या सीमेतील तलावाची मालकी संबंधित गावाकडे दिले आहे. मात्र काही गावे मासेमारीचा व्यवसाय करीत नाही. अशी गावे सहकारी संस्थांना भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थेचे रोहिदास दुमाने, कुंडलिक धनकर, विनोद कांबळे, खुशाल पंडेलगोटा, गोमाजी भोयर, विजय जराते, रघुनाथ मानकर, गोमा भोयर, रघुनाथ धनकर, कमल धनकर, कमल मेश्राम यांनी केली आहे.मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र सदर विभाग कोणतीच मदत करीत नाही. शासनाकडून सुटीवर मत्स्यबीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महागडे बिज खरेदी करावे लागते.- जी. बी. धनकर, सचिव,मत्स्यपालन संस्था, वैरागड