शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

मासेमारी व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:18 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने तलावांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यामुळे मच्छीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

ठळक मुद्देतलावांमध्ये अल्प जलसाठा : मत्स्यपालन सहकारी संस्थांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : यावर्षीच्या पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने तलावांमध्ये अत्यल्प साठा आहे. त्यामुळे मच्छीचा व्यवसाय धोक्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९३ मच्छीपालन सहकारी संस्था आहेत. आरमोरी, कुरखेडा, चामोर्शी व देसाईगंज तालुक्यातील मच्छीपालन संस्था पारंपरिक पध्दतीने मच्छीमारी करणाºया ढिवर समाजाकडे कायम आहेत. मात्र पेसा अंतर्गत गावांमधील तलाव व बोड्यांची मालकी संबंधित गावाकडे गेल्याने मच्छीपालन संस्थांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. पावसाळ्याच्या सुरूवातीला मच्छीबीज टाकले जाते. सदर मच्छी मोठी झाल्यानंतर सर्वसाधारपणे उन्हाळ्यात मासेमारी केली जाते. मात्र यावर्षी तलाव, बोड्यांमध्ये अल्पसाठा आहे. धान पिकासाठी हा पाणीसाठा वापरला जात आहे. परिणामी सदर तलाव, बोड्या डिसेंबर जानेवारी महिन्यातच कोरड्या पडण्याची शक्यता आहे. परिणामी याच महिन्यात मासेमारी करावी लागणार आहे. या कालावधीत मासे पूर्ण वाढ झालेले राहत नसल्याने त्यांचे वजन कमी राहते. याचा फार मोठा फटका संबंधित संस्थांना बसणार आहे. काही संस्थांचा खर्चही भरून निघणे कठीण होणार आहे. वनहक्क कायद्यानुसार तलावांमध्ये अधिकार संबंधित गावांकडे दिले आहेत. यातील काही तलाव व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिले आहेत. काही तलावांमध्ये मासेमारी होत नाही. परिणामी मागील काही दिवसांपासून मत्स्यपालनात कमालीची घट झाली आहे.सहकारी संस्थांकडे पेसातील तलाव द्यापेसा कायद्यानुसार गावाच्या सीमेतील तलावाची मालकी संबंधित गावाकडे दिले आहे. मात्र काही गावे मासेमारीचा व्यवसाय करीत नाही. अशी गावे सहकारी संस्थांना भाडेतत्वावर द्यावी, अशी मागणी मत्स्यपालन सहकारी संस्थेचे रोहिदास दुमाने, कुंडलिक धनकर, विनोद कांबळे, खुशाल पंडेलगोटा, गोमाजी भोयर, विजय जराते, रघुनाथ मानकर, गोमा भोयर, रघुनाथ धनकर, कमल धनकर, कमल मेश्राम यांनी केली आहे.मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी शासनाचा स्वतंत्र विभाग आहे. मात्र सदर विभाग कोणतीच मदत करीत नाही. शासनाकडून सुटीवर मत्स्यबीज पुरवठा केला जात नाही. त्यामुळे महागडे बिज खरेदी करावे लागते.- जी. बी. धनकर, सचिव,मत्स्यपालन संस्था, वैरागड