शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आधुनिक शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 01:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : आदिवासी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाºया दुष्परिणामापासून सावध राहिले पाहिजे. तसेच आदिवासी शेतकºयांनी आधुनिक ...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे आवाहन : शेतकरी महिलांना २० मिनी राईसमिलचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : आदिवासी शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानामुळे शेतीवर होणाºया दुष्परिणामापासून सावध राहिले पाहिजे. तसेच आदिवासी शेतकºयांनी आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन आदिवासी विकास वने, राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.आदिवासी विकास विभाग व पोर्ला इन्सिट्यूट आॅफ साऊथ आशिया बिसा यांच्या पुढाकाराने अहेरी येथे शुक्रवारी अहेरी तालुक्यातील १० व एटापल्ली तालुक्यातील १० अशा एकूण २० लाभार्थ्यांना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते प्रायोगिक तत्त्वावर मिनी राईसमिलचे वाटप करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर, समाजकल्याण सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, भामरागडचे प्रकल्प अधिकारी नीरज मोरे, अहेरीचे सहायक प्रकल्प अधिकारी श्रीकांत धोटे, डॉ.प्रकाश नाईक, प्रफुला राऊत, आशिष नाफडे आदी मान्यवर उपस्थित होते.हवामानातील विषमतेचा शेती उत्पादनावर अनिष्ठ परिणाम होत आहे. अहेरी उपविभागात शेतीच्या उत्पन्नात स्थैर्य येण्यासाठी तसेच तंत्रज्ञानाचा परिस्थितीनुरूप वापर करून शेती उत्पादनात विविधता आणून शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत हवामान सुसंगत गाव प्रकल्प महाराष्टÑातील पालघर, पुणे व गडचिरोली या निवडक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात या प्रकल्पाअंतर्गत २०० गावांची निवड करण्यात आली असून यापैकी २० प्राथमिक गावांना प्रत्येकी एक याप्रमाणे मोबाईल मिनी राईसमिलचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक डॉ.प्रकाश नाईक, संचालन सतीश पडघन यांनी केले. तर आभार आशिष नाफडे यांनी मानले.

टॅग्स :agricultureशेती