शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुराने अनेक मार्ग बंद

By admin | Updated: August 15, 2015 00:12 IST

जनजीवन विस्कळीत : गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याचा परिणाम

अहेरीतील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणीनगर पंचायतीने यावर्षी नाल्यांचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले. अहेरीत गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. मुसळधार पावसामुळे गाळाने भरलेल्या नाल्या चोकअप झाल्या. परिणामी पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अहेरी शहराला दुपारी १२ वाजेपर्यंत बेठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. घरामध्ये पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांचे दैनंदिन उपयोगी साहित्य खराब झाले आहे. याचा दोष नागरिक नगर पंचायत प्रशासनाला देत आहेत. रस्त्यावर पाणी साचले असल्याने आझाद चौक ते दानशूर चौक या मार्गावरील वाहतूक सुध्दा काही कालावधीसाठी बंद झाली होती. अहेरीतील वार्ड क्रमांक तीन मधील आझाद चौक ते दानशूर चौक मार्गावरील प्रदीप पुद्दटवार, राजेंद्र पारेल्लीवार, कवडू नेवले, संजय नरहरशेट्टीवार यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे नुकसान झाले.अंकिसा : तीन महिन्यांपूर्वी येर्रावागू नाल्यावरील पूल वाहून गेला. उन्हाळ्यामध्ये प्रशासनाने या पुलाची दुरूस्ती केली नाही. अंकिसा येथे बालमुत्यमपल्ली, गर्रेपल्ली, चेतालपल्ली, गोल्लगुडम व आसरअल्ली येथील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्याचबरोबर नागरिकही विविध कामांसाठी अंकिसा येथे जातात. या नाल्यावरील पूल तुटला असल्याने नागरिक जीव धोक्यात घालून नायलाजास्तव प्रवास करीत आहेत. मागील दोन दिवसांपासून या परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. तरीही नागरिक नाल्यातून प्रवास करीत आहेत.४० गावांचा संपर्क तुटलाअहेरी-देवलमरी मार्गावरील गडअहेरीच्या ठेंगण्या पुलावर पाणी असल्याने देवलमरी, इंदाराम, व्यंकटापूर, व्यंकटरावपेठा, चेरपल्ली, गडबामणीसह ४० गावांचा संपर्क तुटला. चौडमपल्ली पुलावरून पाणीआष्टी-आलापल्ली मार्गावर असलेल्या चौडमपल्ली नाल्यावरच्या पुलावर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पाणी चढले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास ठप्प पडली होती. या कालावधीत या मार्गावर वाहनांची फार मोठी रांग लागली होती. अचानक मार्ग बंद झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.नगर पंचायतीच्या कारभाराविषयी अहेरीतील नागरिक संतप्तनगर पंचायतीची स्थापना झाल्यापासून अहेरी शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगुण होते. मात्र प्रत्येक्षात नगर पंचायतीची स्थापना होऊनही कोणताच फरक पडला नाही. नगर पंचायतीने पावसाळ्यापूर्वी नाल्या उपसल्या नाहीत. त्यामुळेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले. अनेक नागरिकांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेच्या या अनागोंदी कारभाराविषयी अहेरी येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आता तरी नाल्या उपसाव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.आष्टी येथे घराचे छत कोसळून आर्थिक नुकसानगुरूवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी येथील वार्ड क्रमांक ५ मधील यशवंत खोब्रागडे यांचे राहते घर शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कोसळले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरामध्ये ठेवलेले साहित्य मात्र पाण्याने भिजले आहेत. यामध्ये २० ते २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात घर कोसळल्याने खोब्रागडे कुटुंबियांसमोर निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.