शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

रोवणीदरम्यान शेताच्या बांधावरील सूर झाले लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्या नादात आधुनिक पिढीला शेताच्या बांधावरील पारंपारिक गाणी व लोकगीताचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देलोकगीताची परंपरा; आधुनिकतेत ग्रामीण साज हरविला; बदलत्या काळानुसार गुत्ता पद्धती वाढली

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ‘चिकणल्या भुई माये, चिकणल्या भुई, इतका रोवणा रोवलो, माय तुझ्या सार भुई’ अशा शब्दात आपण उपसलेले सर्व कष्ट केवळ तुझ्या आशीर्वादामुळेच, असे नम्र निवेदन ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर लोकगीताच्या माध्यमातून धरतीला करीत असत. ताल, सूर व एका लयीत गाणे गावून रोवण्याचे काम पूर्ण केले जात होते. मात्र काळाच्या ओघात व आधुनिकतेच्या बदलात शेताच्या बांधावरील हे लोकगीताचे सूर आता लुप्त झाले आहे.शेताच्या बांधावर पावसाच्या सरींसोबत गाण्याच्या सुरांची मुक्त उधळण व्हायची. या गीतातून ईश्वराचे स्मरण केले जायचे. हरिश्चंद्राच्या प्रामाणिकपणाचा दाखला देण्यासाठी चिलिया बाळ, भक्त प्रल्हाद, शिवशंकर, मातापिता यांचा जीवनगौरव असणारे लोकगीत एका तालासुरात शेताच्या बांधावर म्हटले जात होते. धृवपदाचा वारंवार उल्लेख होत असल्याने हे गीत ऐकणाऱ्याला व म्हणणाऱ्याला या गीताचा आघात वारंवार कानी पडावा, असे वाटत असे.‘राम चालले वनाचे वाटे, लक्ष्मण झाडे वाटेचे काटे’ असेही गाणे शेताच्या बांधावर गायले जात होते.रोवणीनंतर दीपपूजा, नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन या सणाची मेजवानी राहत असते. रोवणीच्या मजुरीतून हाती आलेला पैसा ग्रामीण भागात या सणावर गोडधोड पदार्थ बनवून खर्च केला जात असायचा. आता मात्र या सणांबाबतचा ग्रामीण भागातील उत्साह कमी झाला आहे. रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्या नादात आधुनिक पिढीला शेताच्या बांधावरील पारंपारिक गाणी व लोकगीताचा विसर पडला आहे.रोवणी संपवण्याचा आनंद हरपलापूर्वीच्या काळात आजच्या इतकी नांगरणी, चिखलणीची साधने उपलब्ध नव्हती. शेतकरी महिना, दीड महिना रोवणीच्या कामात खपायचा आणि रोवणा संपणे ही शेतकऱ्यांच्या त्या वर्षातील आनंदाची वेळ असायची. मग फणकर, नांगऱ्या, पेठकर तसेच रोवणीच्या कामात शेतात काम करणारे इतर मजूर हे रोवणा समाप्तीला एकमेकांना चिखल लावून आनंद साजरा करीत असत. शेतमालकाच्या घरापर्यंत वाजत-गाजत शेतीचे साहित्य पोहोचवून देऊन शेतमालकाकडून बक्षीस मागायचे. हे दिवस आता संपुष्टात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी