शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीदरम्यान शेताच्या बांधावरील सूर झाले लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्या नादात आधुनिक पिढीला शेताच्या बांधावरील पारंपारिक गाणी व लोकगीताचा विसर पडला आहे.

ठळक मुद्देलोकगीताची परंपरा; आधुनिकतेत ग्रामीण साज हरविला; बदलत्या काळानुसार गुत्ता पद्धती वाढली

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ‘चिकणल्या भुई माये, चिकणल्या भुई, इतका रोवणा रोवलो, माय तुझ्या सार भुई’ अशा शब्दात आपण उपसलेले सर्व कष्ट केवळ तुझ्या आशीर्वादामुळेच, असे नम्र निवेदन ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजूर लोकगीताच्या माध्यमातून धरतीला करीत असत. ताल, सूर व एका लयीत गाणे गावून रोवण्याचे काम पूर्ण केले जात होते. मात्र काळाच्या ओघात व आधुनिकतेच्या बदलात शेताच्या बांधावरील हे लोकगीताचे सूर आता लुप्त झाले आहे.शेताच्या बांधावर पावसाच्या सरींसोबत गाण्याच्या सुरांची मुक्त उधळण व्हायची. या गीतातून ईश्वराचे स्मरण केले जायचे. हरिश्चंद्राच्या प्रामाणिकपणाचा दाखला देण्यासाठी चिलिया बाळ, भक्त प्रल्हाद, शिवशंकर, मातापिता यांचा जीवनगौरव असणारे लोकगीत एका तालासुरात शेताच्या बांधावर म्हटले जात होते. धृवपदाचा वारंवार उल्लेख होत असल्याने हे गीत ऐकणाऱ्याला व म्हणणाऱ्याला या गीताचा आघात वारंवार कानी पडावा, असे वाटत असे.‘राम चालले वनाचे वाटे, लक्ष्मण झाडे वाटेचे काटे’ असेही गाणे शेताच्या बांधावर गायले जात होते.रोवणीनंतर दीपपूजा, नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन या सणाची मेजवानी राहत असते. रोवणीच्या मजुरीतून हाती आलेला पैसा ग्रामीण भागात या सणावर गोडधोड पदार्थ बनवून खर्च केला जात असायचा. आता मात्र या सणांबाबतचा ग्रामीण भागातील उत्साह कमी झाला आहे. रोवणीच्या कामामुळे श्रावणसरीचा वेळ कधी निघून जातो याचे भान राहत नाही. गावातील वयोवृध्द महिला रोवणीच्या कामादरम्यान गाणी म्हणायच्या आणि हे शेताच्या बांधावरील रोवण्याचे गीत दुसऱ्या पिढीतील महिला जशाच्या तशा स्वीकारायच्या. मात्र आता टीव्हीवरील मालिकाच्या नादात आधुनिक पिढीला शेताच्या बांधावरील पारंपारिक गाणी व लोकगीताचा विसर पडला आहे.रोवणी संपवण्याचा आनंद हरपलापूर्वीच्या काळात आजच्या इतकी नांगरणी, चिखलणीची साधने उपलब्ध नव्हती. शेतकरी महिना, दीड महिना रोवणीच्या कामात खपायचा आणि रोवणा संपणे ही शेतकऱ्यांच्या त्या वर्षातील आनंदाची वेळ असायची. मग फणकर, नांगऱ्या, पेठकर तसेच रोवणीच्या कामात शेतात काम करणारे इतर मजूर हे रोवणा समाप्तीला एकमेकांना चिखल लावून आनंद साजरा करीत असत. शेतमालकाच्या घरापर्यंत वाजत-गाजत शेतीचे साहित्य पोहोचवून देऊन शेतमालकाकडून बक्षीस मागायचे. हे दिवस आता संपुष्टात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी