शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
4
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
5
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
6
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
7
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
8
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
9
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
10
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
11
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
12
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
13
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
14
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
15
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
16
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
17
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
18
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
19
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
20
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी तालुक्यातील ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा 'तुलतुली प्रकल्प' कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:39 IST

वनकायद्याचा खोडा : २ हजार हेक्टर वनजमिनीचे हस्तांतरण रखडले; स्थानिकांचाही विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर: आरमोरी तालुक्याच्या तुलतुली गावाजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पाला ४५ वर्षापूर्वी मान्यता मिळाली. दहा वर्षांनंतर किरकोळ कामांना सुरुवातही झाली. या प्रकल्पाचे धरण क्षेत्रातील प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच १९८० चा वनकायदा आड आला. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रवाढीचा धोका ओळखून स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही, ते कागदावरच राहिले.

मानापूर (देलनवाडी) परिसरातील तुलतुली गावाजवळ खोब्रागडी नदीवर १७ डिसेंबर १९७८ रोजी सिंचन प्रकल्पास मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्प किंमत १९.१५ कोटी रुपये होती. या प्रकल्पामुळे ३६ हजार ७७२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती, तसेच प्रकल्पात एकूण २८४.८७ द.ल.घ.मी. पाणीसाठा क्षमता होती. या प्रकल्पाकरिता २२२८.०६ हेक्टी वनजमिनीची आवश्यकता होती; परंतु केंद्र शासनाने ३ ऑगस्ट १९९९ व ९ एप्रिल २००२ रोजी दोनवेळा वनजमिनीस मान्यता नाकारली. मात्र, तत्पूर्वी प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला १९८० मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी धरणस्थळाकरिता पोचमार्ग, स्थायी/अस्थायी इमारत, गोदाम, धरणस्थळाचे स्ट्रिपिंग ही कामे मे १९८३ पर्यंत सुरू होती. 

नियामक मंडळाकडून 'जैसे थे'चे आदेश

  • केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पनिर्मितीतील अडचण दूर करण्यासाठी व पर्यायी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने अभ्यास नागपूर पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाने प्रकल्पाचा अभ्यास केला. ११ जून २०१० मध्ये प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २४३.८० मी.ऐवजी २३८ मीटरपर्यंत घटवून नागपूर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे अहवाल पाठविला.
  • मात्र, प्रकल्पासाठी निश्चित केलेली वनजमीन कमी केली नसल्याचे कारण पुढे करून सदर प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयास पाठविला. त्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीत सदर प्रकल्प रद्द करणे संयुक्तिक नाही, असे ठरवून प्रकल्प 'जैसे थे' ठेवण्यात आला.

६.२१ कोटींचा खर्चतुलतुली प्रकल्पाच्या बाह्यक्षेत्रातील विविध कामांवर मार्च २०१९ अखेर ६.२१ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. प्रकल्पासाठी मंजूर झालेला १२.९५ कोटी निधी अखर्चित आहे. दरम्यान, दवंडी व मांगदा या ठिकाणी कर्मचारी वसाहत बांधण्यात आली. मात्र, सध्या येथील इमारती मोडकळीस आल्या आहेत. याशिवाय धरण, बॅरेज, पंपगृह, कालवा डावा/उजवा, शाखा, वितरिका, लघुकालवे, तसेच इतर कामांवर निधी खर्च प्रस्तावित होता.

४० गावे २२५४.९२८ हेक्टर खासगी जमीन बुडीत क्षेत्रात जाणारपुनर्वसनासाठी प्रस्तावित होते. यात २ हजार २३७ घरे व १० हजार ३५४ लोकसंख्येचा समावेश होता. आता ही लोकसंख्या व वस्त्याही वाढलेल्या आहेत.

"तुलतुली परिसरात जंगल व अन्य वनसंपदा आहे. लोकांची उपजीविका जंगलावर आधारित आहे. प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वनजमीन बाधित होण्याचा धोका होता. याच कारणाने स्थानिक नागरिकांनी प्रकल्पनिर्मितीस विरोध केला. हा प्रकल्प बुडीत क्षेत्र वाढविणारा आहे."- भजन मडकाम, नागरिक तुलतुली तथा माजी सभापती पं.स., आरमोरी

"तुलतुली प्रकल्पासाठी वनजमिनीच्या हस्तांतरणाची मान्यता शासनाकडून मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सद्यःस्थितीत बंदच आहे. शासनाकडून मान्यता मिळत नसल्याने अडचणीत आहेत."- एच. एस. कछवा, उपविभागीय अधिकारी, तुलतुली प्रकल्प 

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीarmori-acअरमोरी