शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

आरमोरी तालुक्यातील ३६ हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा 'तुलतुली प्रकल्प' कागदावरच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 18:39 IST

वनकायद्याचा खोडा : २ हजार हेक्टर वनजमिनीचे हस्तांतरण रखडले; स्थानिकांचाही विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर: आरमोरी तालुक्याच्या तुलतुली गावाजवळ जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्पाला ४५ वर्षापूर्वी मान्यता मिळाली. दहा वर्षांनंतर किरकोळ कामांना सुरुवातही झाली. या प्रकल्पाचे धरण क्षेत्रातील प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच १९८० चा वनकायदा आड आला. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रवाढीचा धोका ओळखून स्थानिक व परिसरातील शेतकऱ्यांनीही विरोध केल्याने प्रकल्पाचे काम पुढे सरकले नाही, ते कागदावरच राहिले.

मानापूर (देलनवाडी) परिसरातील तुलतुली गावाजवळ खोब्रागडी नदीवर १७ डिसेंबर १९७८ रोजी सिंचन प्रकल्पास मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्प किंमत १९.१५ कोटी रुपये होती. या प्रकल्पामुळे ३६ हजार ७७२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार होती, तसेच प्रकल्पात एकूण २८४.८७ द.ल.घ.मी. पाणीसाठा क्षमता होती. या प्रकल्पाकरिता २२२८.०६ हेक्टी वनजमिनीची आवश्यकता होती; परंतु केंद्र शासनाने ३ ऑगस्ट १९९९ व ९ एप्रिल २००२ रोजी दोनवेळा वनजमिनीस मान्यता नाकारली. मात्र, तत्पूर्वी प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला १९८० मध्ये सुरुवात झाली होती. त्यावेळी धरणस्थळाकरिता पोचमार्ग, स्थायी/अस्थायी इमारत, गोदाम, धरणस्थळाचे स्ट्रिपिंग ही कामे मे १९८३ पर्यंत सुरू होती. 

नियामक मंडळाकडून 'जैसे थे'चे आदेश

  • केंद्र शासनाच्या निर्देशानुसार प्रकल्पनिर्मितीतील अडचण दूर करण्यासाठी व पर्यायी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने अभ्यास नागपूर पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाने प्रकल्पाचा अभ्यास केला. ११ जून २०१० मध्ये प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी २४३.८० मी.ऐवजी २३८ मीटरपर्यंत घटवून नागपूर जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे अहवाल पाठविला.
  • मात्र, प्रकल्पासाठी निश्चित केलेली वनजमीन कमी केली नसल्याचे कारण पुढे करून सदर प्रकल्प रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयास पाठविला. त्यानंतर नियामक मंडळाच्या बैठकीत सदर प्रकल्प रद्द करणे संयुक्तिक नाही, असे ठरवून प्रकल्प 'जैसे थे' ठेवण्यात आला.

६.२१ कोटींचा खर्चतुलतुली प्रकल्पाच्या बाह्यक्षेत्रातील विविध कामांवर मार्च २०१९ अखेर ६.२१ कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे. प्रकल्पासाठी मंजूर झालेला १२.९५ कोटी निधी अखर्चित आहे. दरम्यान, दवंडी व मांगदा या ठिकाणी कर्मचारी वसाहत बांधण्यात आली. मात्र, सध्या येथील इमारती मोडकळीस आल्या आहेत. याशिवाय धरण, बॅरेज, पंपगृह, कालवा डावा/उजवा, शाखा, वितरिका, लघुकालवे, तसेच इतर कामांवर निधी खर्च प्रस्तावित होता.

४० गावे २२५४.९२८ हेक्टर खासगी जमीन बुडीत क्षेत्रात जाणारपुनर्वसनासाठी प्रस्तावित होते. यात २ हजार २३७ घरे व १० हजार ३५४ लोकसंख्येचा समावेश होता. आता ही लोकसंख्या व वस्त्याही वाढलेल्या आहेत.

"तुलतुली परिसरात जंगल व अन्य वनसंपदा आहे. लोकांची उपजीविका जंगलावर आधारित आहे. प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वनजमीन बाधित होण्याचा धोका होता. याच कारणाने स्थानिक नागरिकांनी प्रकल्पनिर्मितीस विरोध केला. हा प्रकल्प बुडीत क्षेत्र वाढविणारा आहे."- भजन मडकाम, नागरिक तुलतुली तथा माजी सभापती पं.स., आरमोरी

"तुलतुली प्रकल्पासाठी वनजमिनीच्या हस्तांतरणाची मान्यता शासनाकडून मिळाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम सद्यःस्थितीत बंदच आहे. शासनाकडून मान्यता मिळत नसल्याने अडचणीत आहेत."- एच. एस. कछवा, उपविभागीय अधिकारी, तुलतुली प्रकल्प 

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीarmori-acअरमोरी