शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीतील १७० एकर धान तुडतुड्याने केले नष्ट

By admin | Updated: November 2, 2014 22:34 IST

देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

तुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. तुळशी गावात यावर्षी जवळपास ३७५ हेक्टर शेती धानपीकाखाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीपासून फवारणीपर्यंत जवळपास ३० हजार रूपये खर्च शेतीवर आला. धान ऐन कापणीला आलेले असताना १५ दिवसांपूर्वी तुडतुडाचे जोरदार आक्रमण धानपीकावर झाले व जवळजवळ १७० एकर शेत जमिनीवरचे धान पूर्णत: नष्ट झाले आहेत. तुळशी येथील शेतकरी अल्पभुधारक असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. तुळशी येथील विष्णू दुनेदार यांचे ५ एकर, नरेंद्र दुनेदार यांचे ३ एकर, लालाजी नाकाडे यांचे ३ एकर, महादेव राऊत २ एकर, यशवंत राऊत २ एकर, बाबुराव पत्रे ३ एकर, ज्ञानेश्वर सुकारे २ एकर, केवलराम दोनाडकर १ एकर, हर्षवर्धन लोणारे ३ एकर, हुमणे २ एकर, हरिजी पिल्लारे ३ एकर, कान्हाजी दुनेदार ३ एकर, रसिका झुरे १ एकर, मोरेश्वर दुनेदार १ एकर, प्रकाश पत्रे २ एकर, मोतीलाल दोनाडकर या शेतकऱ्याचे १ एकरावरील धान पूर्णत: तुडतुड्यामुळे हातून निघून गेले आहे. तुडतुड्याची लागन होताच कृषी विभागाने तत्काळ मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कंपन्यांची औषधीसुध्दा फवारली. परंतु त्याचाही काहीही उपयोग झाला नाही, असे शेतकरी वसंत मिरगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाने तत्काळ सर्व्हेक्षण करून एकरी २० हजार रूपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणविस यांना निवेदन सादर करणार आहेत.(वार्ताहर)