शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

तुळशीतील १७० एकर धान तुडतुड्याने केले नष्ट

By admin | Updated: November 2, 2014 22:34 IST

देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे.

तुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथे पावसाळी हंगामातील धानपीकावर तुडतुड्याने आक्रमण केले असून एकाच गावातील १७० एकर शेतातील धानपीकाचे पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. तुळशी गावात यावर्षी जवळपास ३७५ हेक्टर शेती धानपीकाखाली आहे. शेतकऱ्यांना रोवणीपासून फवारणीपर्यंत जवळपास ३० हजार रूपये खर्च शेतीवर आला. धान ऐन कापणीला आलेले असताना १५ दिवसांपूर्वी तुडतुडाचे जोरदार आक्रमण धानपीकावर झाले व जवळजवळ १७० एकर शेत जमिनीवरचे धान पूर्णत: नष्ट झाले आहेत. तुळशी येथील शेतकरी अल्पभुधारक असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. तुळशी येथील विष्णू दुनेदार यांचे ५ एकर, नरेंद्र दुनेदार यांचे ३ एकर, लालाजी नाकाडे यांचे ३ एकर, महादेव राऊत २ एकर, यशवंत राऊत २ एकर, बाबुराव पत्रे ३ एकर, ज्ञानेश्वर सुकारे २ एकर, केवलराम दोनाडकर १ एकर, हर्षवर्धन लोणारे ३ एकर, हुमणे २ एकर, हरिजी पिल्लारे ३ एकर, कान्हाजी दुनेदार ३ एकर, रसिका झुरे १ एकर, मोरेश्वर दुनेदार १ एकर, प्रकाश पत्रे २ एकर, मोतीलाल दोनाडकर या शेतकऱ्याचे १ एकरावरील धान पूर्णत: तुडतुड्यामुळे हातून निघून गेले आहे. तुडतुड्याची लागन होताच कृषी विभागाने तत्काळ मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विविध कंपन्यांची औषधीसुध्दा फवारली. परंतु त्याचाही काहीही उपयोग झाला नाही, असे शेतकरी वसंत मिरगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शासनाने तत्काळ सर्व्हेक्षण करून एकरी २० हजार रूपयाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणविस यांना निवेदन सादर करणार आहेत.(वार्ताहर)