शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:23 IST

आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण

विष्णू सवरा : जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींच्या १० वसतिगृहांचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण आणि त्याच तोडीचे दर्जेदार शिक्षण देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या जिद्दीने स्वत:ची प्रगती करुन घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी गुरूवारी येथे केले. चातगांव येथे बांधण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी याच ठिकाणी जिल्हयातील विविध ठिकाणच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या वसतिगृहांचे प्रतिकात्मक उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तत्पुर्वी धानोरा येथील विद्यार्थिनी वसतिगृह तसेच लगतच्या सोडे येथील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी आमदार हिरामन वरखेडे, आदिवासी सेवक तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, समाजसेवक देवाजी तोफा, आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.बिपीन ईटनकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यात वाढ होत आहे ही चांगली बाब आहे यात गुणात्मक सुधार आवश्यक आहे. शाळांचा निकाल ९७ ते १०० टक्के लागत आहे. आता आदिवासी विद्यार्थी राज्यातून, विभागातून पहिला यावा हे ध्येय समोर असले पाहिजे, असे सवरा म्हणाले. आमदार डॉ.होळी आणि गजबे यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने वर्ग ३ व ४ ची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश आपण दिले आहेत, अशीही माहिती सवरा यांनी यावेळी दिली. सोडे येथील कार्यक्रमात आदिवासी नृत्याने ना.सावरा याचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी संस्कृती तसेच आदिवासी नृत्य यांचे दर्शन घडविले. प्रास्ताविक डॉ.बिपीन ईटनकर यांनी तर सूत्र संचालन कुलकर्णी यांनी व आभार प्रदर्शन गृहपाल जाधव यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता.या वसतिगृहांचे झाले प्रतिकात्मक लोकार्पणवसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंगारा येथील नवीन वर्गखोली व वसतिगृह, आश्रमशाळा मसेल येथील मुलींचे वसतिगृह, आश्रमशाहा गॅरापत्ती येथील मुला-मुलींचे वसतिगृह व आश्रमशाळा भाकरोंडी येथील शाळा संकुल नूतन इमारतीचे प्रतिकात्मक लोकार्पण यावेळी झाले. यामुळे १२८० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार आहे.स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न व्हायला हवे- पालकमंत्रीआदिवासी विद्यार्थी बुध्दीवंत आहेत. त्यांना मार्गदर्शन मिळण्याची अधिक आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी किमान ३ वर्ष कालावधीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे. यातून चांगले अधिकारी घडू शकतील असे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या सूचनेची दखल घेऊन असे केंद्र येणाऱ्या काळात सुरु करण्याचा निर्णय घेऊ, असे सवरा यांनी आपल्या भाषणात सांगितले.