शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:23 IST

आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण

विष्णू सवरा : जिल्ह्यातील आदिवासी मुलामुलींच्या १० वसतिगृहांचे उद्घाटनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण आणि त्याच तोडीचे दर्जेदार शिक्षण देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या जिद्दीने स्वत:ची प्रगती करुन घ्यावी, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी गुरूवारी येथे केले. चातगांव येथे बांधण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी याच ठिकाणी जिल्हयातील विविध ठिकाणच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या वसतिगृहांचे प्रतिकात्मक उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तत्पुर्वी धानोरा येथील विद्यार्थिनी वसतिगृह तसेच लगतच्या सोडे येथील विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम होते. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे, माजी आमदार हिरामन वरखेडे, आदिवासी सेवक तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, समाजसेवक देवाजी तोफा, आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ.माधवी खोडे, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.बिपीन ईटनकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यात वाढ होत आहे ही चांगली बाब आहे यात गुणात्मक सुधार आवश्यक आहे. शाळांचा निकाल ९७ ते १०० टक्के लागत आहे. आता आदिवासी विद्यार्थी राज्यातून, विभागातून पहिला यावा हे ध्येय समोर असले पाहिजे, असे सवरा म्हणाले. आमदार डॉ.होळी आणि गजबे यांनी केलेल्या मागण्यांची दखल घेण्यात आली आहे. याच अनुषंगाने वर्ग ३ व ४ ची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश आपण दिले आहेत, अशीही माहिती सवरा यांनी यावेळी दिली. सोडे येथील कार्यक्रमात आदिवासी नृत्याने ना.सावरा याचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी मराठी संस्कृती तसेच आदिवासी नृत्य यांचे दर्शन घडविले. प्रास्ताविक डॉ.बिपीन ईटनकर यांनी तर सूत्र संचालन कुलकर्णी यांनी व आभार प्रदर्शन गृहपाल जाधव यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसत होता.या वसतिगृहांचे झाले प्रतिकात्मक लोकार्पणवसतिगृह लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह मोहली, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अंगारा येथील नवीन वर्गखोली व वसतिगृह, आश्रमशाळा मसेल येथील मुलींचे वसतिगृह, आश्रमशाहा गॅरापत्ती येथील मुला-मुलींचे वसतिगृह व आश्रमशाळा भाकरोंडी येथील शाळा संकुल नूतन इमारतीचे प्रतिकात्मक लोकार्पण यावेळी झाले. यामुळे १२८० विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या निवासाची सोय होणार आहे.स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न व्हायला हवे- पालकमंत्रीआदिवासी विद्यार्थी बुध्दीवंत आहेत. त्यांना मार्गदर्शन मिळण्याची अधिक आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी किमान ३ वर्ष कालावधीसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करावे. यातून चांगले अधिकारी घडू शकतील असे पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. या सूचनेची दखल घेऊन असे केंद्र येणाऱ्या काळात सुरु करण्याचा निर्णय घेऊ, असे सवरा यांनी आपल्या भाषणात सांगितले.