शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

रॉयल्टी न देताच तेंदूपत्ता खरेदीचे प्रयत्न

By admin | Updated: May 24, 2017 00:32 IST

लिलावादरम्यान ठरविलेल्या गोणीपेक्षा अधिक तेंदूपत्ता संकलित झाल्यास सदर तेंदूपत्ता रॉयल्टी न देताच खरेदी करण्याचे प्रयत्न कंत्राटदारांनी सुरू केले आहेत.

प्रतीगोणी १० हजार रूपयांचे नुकसान : संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लिलावादरम्यान ठरविलेल्या गोणीपेक्षा अधिक तेंदूपत्ता संकलित झाल्यास सदर तेंदूपत्ता रॉयल्टी न देताच खरेदी करण्याचे प्रयत्न कंत्राटदारांनी सुरू केले आहेत. यामुळे ग्रामसभांचे लाखो रूपयांचे नुकसान होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ग्रामसभांपैकी सुमारे ११०० ग्रामसभा स्वत:च तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. तेंदूपत्त्याचा लिलाव करतेवेळी तेंदूपत्त्याचा दर व संकलीत होणारा तेंदूपत्ता याबाबतचा करारनामा करण्यात आला. या करारनाम्यात जेवढे गोणी तेंदूपत्ता लिहिला आहे. तेवढचे गोणी तेंदूपत्ता आपण खरेदी करू, अधिकचा तेंदूपत्ता आपण खरेदी करणार नाही. अधिकचा तेंदूपत्ता खरेदी केल्यास आपण त्याची रॉयल्टी देणार नाही, असा पवित्रा कंत्राटदारांनी घेतला आहे. यावर्षी उन्हाळ्यात पाऊस झाला नाही. कडक उन्हामुळे तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे व तेंदूपत्ताही अधिक आला आहे. त्यामुळे प्रत्येकच गावात ठरविलेल्या गोणी पेक्षा अधिकचा तेंदूपत्ता गोळा होत आहे. मात्र कंत्राटदारांच्या या अडवणुकीच्या धोरणामुळे गावकरी अडचणीत आले आहेत. प्रती शेकडा ३५० ते ४०० रूपये दर दिला जात आहे. प्रत्येक गोणीचा मजुरीचा दर ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये होणार आहे. मात्र यावर्षी तंदूपत्त्याचा रॉयल्टीसह एकंदरीत दर १२ हजार ते १८ हजार रूपयांपर्यंत गेला आहे. रॉयल्टी न दिल्यास प्रती गोणी जवळपास १० हजार रूपयांचे नुकसान ग्रामसभेला सोसावे लागणार आहे. राष्ट्रीयस्तरावरील बाजारात तेंदूपत्ता तेजीत आहे. त्यामुळे अधिकच्या तेंदू संकलनात कंत्राटदारालाच अधिकचा नफा होणार आहे. मात्र कमीत कमी किंमतीत कसा तेंदूपत्ता संकलीत होईल, यासाठी कंत्राटदाराचा डाव असल्याचे दिसून येत आहे.ग्रामसभांनी स्वत: संकलित करावाअतिरिक्त तेंदू पुडा कंत्राटदार खरेदी करण्यास तयार नसेल तर ग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलीत करावा. सदर तेंदूपत्ता साठवून ठेवून त्याची विक्री करावी. जो कंत्राटदार यावर्षी अतिरिक्त तेंदू पुडा संकलीत करणार नाही, अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून यानंतर भविष्यात कधीच संबंधित कंत्राटदाराला कंत्राट मिळणार नाही, असाही निर्णय सर्वच ग्रामसभांनी घ्यावा. यामुळे कंत्राटदारांवरही दबाव निर्माण होण्यास मदत होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.