शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

रेल्वेचे बांधकाम कार्यालय जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

By admin | Updated: April 5, 2015 01:47 IST

भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे.

गडचिरोली : भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे. ते गडचिरोली जिल्ह्यात आणण्यासाठी केंद्र सरकारस्तरावर खासदार अशोक नेते यांचा पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या दोघांचीही भेट घेऊन त्यांना पत्रही दिले आहे.गडचिरोली हा देशातील २५ अतिमागास जिल्ह्यात समाविष्ट असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात रेल्वेच्या दळणवळणाचे जाळे केवळ १९ किमीचे आहे. नक्षल कारवायांनी प्रभावित असलेल्या या जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेच्या दळणवळणाचा साधन निर्माण होणे आवश्यक आहे. या जिल्ह्यात असलेले व दक्षिणपूर्व रेल्वे अंतर्गत येणारे वडसा हे रेल्वे स्थानक बिलासपूर झोनमध्ये मोडते. मागील ३०-४० वर्षांपासून वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गासाठी २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ८० कोटी रूपयांची तरतूद केंद्र सरकारने करून दिलेली आहे व राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा देणार असल्याचे राज्य सरकारने पंतप्रधानांना कळविले आहे. वडसा-गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग व नागपूर-नागभिड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातूनच होणार आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे असलेले रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे युनिट (कार्यालय) वडसा येथे हलविण्यात यावे, अशी मागणी खासदार नेते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्र व्यवहारही त्यांनी केंद्र सरकारकडे केला आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास खासदार नेते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)