शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

रेल्वेचे बांधकाम कार्यालय जिल्ह्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

By admin | Updated: April 5, 2015 01:47 IST

भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे.

गडचिरोली : भारतीय रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय सध्या बिलासपूरमध्ये आहे. ते गडचिरोली जिल्ह्यात आणण्यासाठी केंद्र सरकारस्तरावर खासदार अशोक नेते यांचा पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या दोघांचीही भेट घेऊन त्यांना पत्रही दिले आहे.गडचिरोली हा देशातील २५ अतिमागास जिल्ह्यात समाविष्ट असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात रेल्वेच्या दळणवळणाचे जाळे केवळ १९ किमीचे आहे. नक्षल कारवायांनी प्रभावित असलेल्या या जिल्ह्याच्या विकासासाठी रेल्वेच्या दळणवळणाचा साधन निर्माण होणे आवश्यक आहे. या जिल्ह्यात असलेले व दक्षिणपूर्व रेल्वे अंतर्गत येणारे वडसा हे रेल्वे स्थानक बिलासपूर झोनमध्ये मोडते. मागील ३०-४० वर्षांपासून वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गासाठी २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ८० कोटी रूपयांची तरतूद केंद्र सरकारने करून दिलेली आहे व राज्य सरकार आपला ५० टक्के वाटा देणार असल्याचे राज्य सरकारने पंतप्रधानांना कळविले आहे. वडसा-गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग व नागपूर-नागभिड ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे काम गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातूनच होणार आहे. त्यामुळे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथे असलेले रेल्वेच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे युनिट (कार्यालय) वडसा येथे हलविण्यात यावे, अशी मागणी खासदार नेते यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पत्र व्यवहारही त्यांनी केंद्र सरकारकडे केला आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास खासदार नेते यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. (जिल्हा प्रतिनिधी)