शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करा

By admin | Updated: December 2, 2015 01:08 IST

शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव नाही, महागाई, रखडलेले सिंचन प्रकल्प, दुष्काळ आदीसह महाराष्ट्र राज्यात महिलांचे विविध प्रश्न कायम आहेत.

गडचिरोलीत मेळावा : चारूलता टोकस यांचे आवाहनगडचिरोली : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव नाही, महागाई, रखडलेले सिंचन प्रकल्प, दुष्काळ आदीसह महाराष्ट्र राज्यात महिलांचे विविध प्रश्न कायम आहेत. भाजप प्रणित सरकारचे जनमानसांविरूध्द असलेले धोरण गावागावात जाऊन सांगा तसेच गाव पातळीपासून तालुका व तालुका पातळीपासून जिल्हा व राज्यस्तरापर्यंत महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करा, असे आवाहन महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केले. जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित महिला कार्यकर्त्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव वनमाला राठोड, अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव सगुणा तलांडी, प्रदेश महासचिव प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते जेसा मोटवानी, धानोरा पं.स.च्या सभापती कल्पना वड्डे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, देसाईगंजच्या नगरसेविका निलोफर शेख, पं.स. सदस्य जास्वंदा करंगामी, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा जुमनाके आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना चारूलता टोकस म्हणाल्या, काँग्रेसच्या सरकारने आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना कार्यान्वित केल्या होत्या. मात्र भाजप सेना प्रणित युती सरकारने अनेक योजना गुंडाळण्याचा प्रयत्न चालविला आहे. अनेक योजनांचे नाव बदलवून काँग्रेस सरकारच्या काळातील जुन्या योजना अंमलात आणल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यात भाजपप्रणित सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग धंदे नसल्याने पुरूषांसह महिलाही बेरोजगार झाल्या आहेत. काँग्रेसचे ध्येय, धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून येत्या चार वर्षांत पक्ष संघटन मजबूत करावे, भाजप-सेना पक्षाची सत्ता आगामी काळात उलथवून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही टोकस यांनी यावेळी केले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील अनेक लोकाभिमुख योजनेचा लाभ सर्वसामान्य व गरीब नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असा सल्लाही टोकस यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, सगुना तलांडी व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, संचालन अर्चना जनगनवार यांनी केले. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष मंदा तुरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कोवे, अहेरीच्या तालुकाध्यक्ष सविता आत्राम, गडचिरोलीच्या तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाने, लता ढोक, रोशना शिंपी, जया बांबोळे, पद्मा पसुला आदीसह बहुसंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)