शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करा

By admin | Updated: December 2, 2015 01:08 IST

शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव नाही, महागाई, रखडलेले सिंचन प्रकल्प, दुष्काळ आदीसह महाराष्ट्र राज्यात महिलांचे विविध प्रश्न कायम आहेत.

गडचिरोलीत मेळावा : चारूलता टोकस यांचे आवाहनगडचिरोली : शेतकऱ्यांच्या धानाला योग्य भाव नाही, महागाई, रखडलेले सिंचन प्रकल्प, दुष्काळ आदीसह महाराष्ट्र राज्यात महिलांचे विविध प्रश्न कायम आहेत. भाजप प्रणित सरकारचे जनमानसांविरूध्द असलेले धोरण गावागावात जाऊन सांगा तसेच गाव पातळीपासून तालुका व तालुका पातळीपासून जिल्हा व राज्यस्तरापर्यंत महिला काँग्रेसचे संघटन वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करा, असे आवाहन महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केले. जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने इंदिरा गांधी चौकातील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित महिला कार्यकर्त्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून महिला प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव वनमाला राठोड, अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव सगुणा तलांडी, प्रदेश महासचिव प्रभाकर वासेकर, ज्येष्ठ नेते जेसा मोटवानी, धानोरा पं.स.च्या सभापती कल्पना वड्डे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, देसाईगंजच्या नगरसेविका निलोफर शेख, पं.स. सदस्य जास्वंदा करंगामी, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रतिभा जुमनाके आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना चारूलता टोकस म्हणाल्या, काँग्रेसच्या सरकारने आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक लोकाभिमुख योजना कार्यान्वित केल्या होत्या. मात्र भाजप सेना प्रणित युती सरकारने अनेक योजना गुंडाळण्याचा प्रयत्न चालविला आहे. अनेक योजनांचे नाव बदलवून काँग्रेस सरकारच्या काळातील जुन्या योजना अंमलात आणल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यात भाजपप्रणित सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग धंदे नसल्याने पुरूषांसह महिलाही बेरोजगार झाल्या आहेत. काँग्रेसचे ध्येय, धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून येत्या चार वर्षांत पक्ष संघटन मजबूत करावे, भाजप-सेना पक्षाची सत्ता आगामी काळात उलथवून टाकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही टोकस यांनी यावेळी केले. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातील अनेक लोकाभिमुख योजनेचा लाभ सर्वसामान्य व गरीब नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असा सल्लाही टोकस यांनी महिला कार्यकर्त्यांना दिला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, सगुना तलांडी व मान्यवरांनी मार्गदर्शन केले.मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, संचालन अर्चना जनगनवार यांनी केले. कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष मंदा तुरे, आरमोरी तालुकाध्यक्ष मंगला कोवे, अहेरीच्या तालुकाध्यक्ष सविता आत्राम, गडचिरोलीच्या तालुकाध्यक्ष ज्योती गव्हाने, लता ढोक, रोशना शिंपी, जया बांबोळे, पद्मा पसुला आदीसह बहुसंख्य कार्यकर्त्या उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)