शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

टसर रेशीम उद्याेग वाढीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

आरमाेरी : राज्याचे वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरमोरी येथील टसर रेशीम केंद्रास ...

आरमाेरी : राज्याचे वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरमोरी येथील टसर रेशीम केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी टसर रेशीम केंद्रातील टसर रेशीम निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला टसर रेशीम उत्पादनाला चालना देऊन ढिवर व आदिवासी वर्गाच्या उदरनिर्वाह व्यवसायाला चालना द्या, अशा सूचना केल्या.

आरमोरी येथील रेशीम केंद्रावर सात एकरांमध्ये कार्यालय परिसरात टसर रेशीम केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या रेशीम केंद्राच्या अंतर्गत जिल्ह्यातील ४०० हेक्टर वन क्षेत्रामध्ये कमी-अधिक प्रमाणात रेशीमची निर्मिती केली जाते. यावेळी राज्यमंत्री यांनी टसर रेशीमची प्रक्रिया जाणून घेतली व टसर रेशीम कापडाला भरपूर मागणी असल्यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे, असे मत व्यक्त केले. टसर कोष उत्पादन तसेच टसर सूत उत्पादन आणि तसेच कापड उत्पादन इत्यादी प्रक्रियेमध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता आहे त्यामुळे जिल्ह्यातील टसर कोष उत्पादन वाढीवर भर देऊन गडचिरोली जिल्ह्यातील ढिवर तसेच आदिवासी समाजातील जास्तीत जास्त कुटुंबांना याचा फायदा होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टसर रेशीम सूत निर्मिती प्रशिक्षण केंद्र तसेच टसर कोष निर्मिती प्रक्रिया, रेशीम यंत्र पाहणी करून याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी रिलींग बंदा कोष, चलपट कोष, दुदरू कोष यामधील प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली. या ठिकाणी उपस्थित टसर रेशीम कर्मचारी यांच्याशी संवादही साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.व्ही. आव्हाड, अशोक विसपुते, स्वीय सहायक सचिन बडवे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

बाॅक्स ..

मदतीचे दिले आश्वासन

टसर लाभार्थीचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून काही अल्पभूधारक आहे. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून ते टसर कोष उत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करून तसेच रेशीम उत्पादनात वाढ व उद्योग व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात यासाठी

शासन आवश्यकतेनुसार आपणाला मदत करेल, असे आश्वासन यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी प्रशासनाला दिले.