शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तेंदूपत्त्याने भरलेल्या ट्रकला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:30 IST

तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता.

ठळक मुद्देवीज तारांना स्पर्श : आलापल्ली येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : तेंदूपत्त्याची पोती भरून जात असलेल्या ट्रकला आग लागल्याने तेंदूपत्त्यासह ट्रक जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वाजता आलापल्ली येथे घडली. ट्रकमध्ये जवळपास ३० लाखांचा तेंदूपत्ता होता.फळीवर गोळा केलेला तेंदूपत्ता आता गोदामात साठविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ट्रकच्या मदतीने तेंदूपत्त्याची वाहतूक केली जात आहे. सीजी ०८ एएच ९१११ क्रमांकाचा ट्रक वेलगूर येथून तेंदूपत्ता घेऊन बल्लारपूरकडे जात होता. आलापल्ली शहरातून ट्रक जात असताना ट्रकवरील पोत्यांचा वीज तारांना स्पर्श झाला. त्यामुळे ट्रक लागली. ट्रकमध्ये केवळ वाहन चालक असल्याने ट्रकला लागलेली आग ट्रक चालकाच्या लक्षात आली नाही. आलापल्ली येथील युवकांना ट्रक जळत असल्याची बाब लक्षात आली. सदर घटना ट्रक चालकाच्या लक्षात आणून दिली. गावात ट्रक उभा ठेवल्यास इतर दुकाने व घरांना आग लागण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहन चालकाने ट्रक गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आलापल्ली येथील राम मंदिरापासून ते जेमतेम रेड्डी पार्कपर्यंतच वाहन जाऊ शकले. यादरम्यान वाहन जात असताना जळते तेंदूपत्त्याचे पोते रस्त्यावर पडत होते. त्यामुळे राम मंदिर ते रेड्डीपार्कपर्यंत आग पसरल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाहन चालकाने शहीद अजय मास्टे चौकातून सिरोंचाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन वळवून उभे केले. या सर्व घटनेत सुदैवाने वाहन चालक सुरक्षित आहे. अहेरीचे पोलीस निरिक्षक सतिश होडगर यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. अग्निशमन दलाच्या वाहनाचे चालक नसल्याने वाहन उपलब्ध झाले नाही. काही वेळातच ट्रक जळून खाक झाला.ओव्हरलोड तेंदूपत्ता नेणाऱ्या वाहनांवर कारवाई नाहीतेंदूपत्ता हलका राहत असल्याने ट्रकपेक्षा अधिक उंचावर पोते भरले जातात. या पोत्यांचा गावातील वीज तारांना स्पर्श होऊन आगी लागल्याच्या घटना घडतात. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक पोलीस यांच्या मार्फत कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस उंचच उंच तेंदूपत्त्याच्या थप्प्या ट्रकमध्ये भरण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे.