शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
3
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
4
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
5
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
6
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
7
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
8
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
9
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
10
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
11
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
12
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
13
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
14
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
15
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
16
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
17
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
18
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
19
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
20
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

सामाजिक समता प्रस्थापित करणारे खरे महानायक छत्रपती शिवाजी

By admin | Updated: February 20, 2016 02:06 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाज व्यवस्था समान होती. नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांनी भेदभाववृत्तीला कधीही थारा दिला नाही.

शिव जयंती सोहळा : मोहम्मद अय्युब यांचे प्रतिपादन गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील समाज व्यवस्था समान होती. नव्हे, छत्रपती शिवाजी महाराजांनी भेदभाववृत्तीला कधीही थारा दिला नाही. शिवाजी महाराजांनी आपल्या नैतिक शौर्य व वीरतेच्या बळावरहिंदवी स्वराज्य निर्माण केले. सामाजिक समता प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज खरे महानायक होते, असे प्रतिपादन जमाते इस्लामी हिंद नागपूरचे पदाधिकारी प्रा. मोहम्मद अय्युब यांनी केले. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथील शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित शिव जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ येथील भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय प्रचारक डॉ. समीर कदम होते. प्रमुख अतिथी म्हणून बावणे कुणबी समाज संघटनेचे प्राचार्य तेजराव बोरकर, प्रा. मुकेश उरकुडे, प्रा. सूर्यकांत भोंगळे, रत्नदीप म्हशाखेत्री, देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, चंद्रकांत लेनगुरे, रामदास होकम, दत्तात्रेय खरवडे, नामदेव शेंडे, जनार्धन ताकसांडे, अशोक गडकरी, दिलीप माणुसमारे, सुरेश मांडवगडे, रफिक कुरैशी, गोवर्धन चव्हाण, धर्मानंद मेश्राम, पांडुरंग भांडेकर, डी. एन. बर्लावार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात समाज व्यवस्था’ या विषयावर बोलताना प्रा. मोहम्मद अय्युब म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये लहानपणापासून नेतृत्त्व गुण होते. शिवाजी महाराजाला माता जिजाऊ यांनी लहानपणापासून वीरगाथा ऐकविल्या. त्यामुळेच त्यांच्यात शौर्यगुण ओतप्रोत होते. समाजातील भ्रष्टाचार, दुराचार, व्यभिचार व अत्याचाराविरोधात शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारले. शिवाजी महाराज यांना सर्व जाती धर्माच्या लोकांविषयी आदरभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज आध्यात्मिक होते. त्यांनी आपला राज्यकारभार पूर्ण जबाबदारीने व न्यायाने केला. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. अशा जबाबदार महानायकाची आता महाराष्ट्राला गरज आहे, असेही मोहम्मद अय्युब यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष पांडुरंग नागापुरे, संचालन संध्या येलेकर, स्मिता लडके यांनी केले तर आभार विनायक बांदूरकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्राचार्य खुशाल वाघरे, दादाजी चुधरी, प्रा. शेषराव येलेकर, सुरेश लडके, एस. टी. विधाते, सुरेश डोंगे, राजेंद्र गोहणे, पी. एम. झंझाळ, पुरूषोत्तम म्हस्के, प्राचार्य घनश्याम दिवटे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)