शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वनरक्षकांच्या बहिष्काराने राज्यातील यंदाची व्याघ्रगणना अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 10:35 IST

राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपीडीए केला परत : २० पासून जनगणना

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राज्यभरातील व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत करण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे. मात्र मागील एक महिन्यांपासून वनरक्षक व वनपालांनी तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येण्याची शक्यता आहे.वनरक्षक व वनपाल हे तांत्रिक कर्मचारी नाहीत, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासही शासन चालढकल करीत आहे. शासन आपल्याला तांत्रिक कर्मचारी मानत नसल्याने आपण तांत्रिक कामे करणार नाही, असा पवित्रा घेत राज्यभरातील वनरक्षक व वनपालांनी १२ नोव्हेंबरपासून तांत्रिक कामांवर बहिष्कार घातला आहे. वन गुन्ह्यांची नोंद करणे, रोपट्यांची नोंद करणे आदी महत्त्वपूर्ण बाबी वन विभाग जीपीएसच्या माध्यमातून करीत आहे. यासाठी वनरक्षक व वनपालांना पीडीए सयंत्र दिले आहे. ११ नोव्हेंबरच्या आंदोलनानंतर वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी पीडीए सयंत्र परत केले आहे.देशभरातील व्याघ्रगणना दर चार वर्षांनी केली जाते. यावर्षी व्याघ्रगणना २० ते २५ जानेवारी या कालावधीत केली जाणार आहे. व्याघ्रगणना करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी वनरक्षक व वनपाल पार पाडतात. व्याघ्रगणनेचे कामही जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून केले जाते. मात्र वनरक्षक व वनपालांनी जीपीएस यंत्र परत केले असल्याने व्याघ्रगणना अडचणीत येणार आहे. त्यामुळे शासन नेमका कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Tigerवाघ