शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

त्रिवेणी संगमावर स्वच्छता मोहीम

By admin | Updated: February 7, 2015 00:51 IST

गंगा वाचवा मोहिमेच्या धर्तीवर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील शाळकरी मुले, शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने इंद्रावती- पामुलगौतमी- पर्लकोटा...

भामरागड : गंगा वाचवा मोहिमेच्या धर्तीवर हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातील शाळकरी मुले, शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने इंद्रावती- पामुलगौतमी- पर्लकोटा नद्यांचा त्रिवेणी संगम स्वच्छता मोहिमेचा प्रकल्प हाती घेतला आहे. भामरागड येथे देश- विदेशातून हजारो पर्यटक येतात. मात्र त्रिवणी संगमावर दारू पार्ट्यामुळे हा परिसर प्रदूषित झाला आहे. लोकबिरादरीच्या विद्यार्थ्यांनीच ही स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. समाजसेवक बाबा आमटे यांचे पुत्र डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांनी ४५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट अरण्य असलेल्या भामरागडसारख्या अतिशय दुर्गम भागात लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना करून स्थानिक आदिवासींना आरोग्य व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. आज येथील आदिवासींना अत्याधुनिक उपचार मिळतो तसेच इंग्रजी व मराठी माध्यमातून शिक्षणसुद्धा मिळते. याच शिक्षणाच्या बळावर आज अनेक आदिवासींची मुले डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक तसेच समाजातील विविध क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. इंद्रावती- पामुलगौतम- पर्लकोटा नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेल्या निसर्गरम्य भामरागड येथे देशी- विदेशी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लगतच्या आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून असंख्य पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येथे येतात. मात्र, पर्यटकांनी भामरागड येथील निसर्गरम्य परिसर मटण, दारू पार्ट्यामुळे अस्वच्छ व प्रदूषित करून ठेवला आहे. डॉ. प्रकाश आमटे यांनी याबद्दल खंत व्यक्त केली आहे. भामरागड येथील सुंदर त्रिवेणी संगमावर येणाऱ्या काही पर्यटकांनी प्लास्टिक, दारूच्या बॉटला व इतर कचऱ्याने अतिशय घाण केली आहे. जिल्हा प्रशासनाची अतिशय निराशावादी भूमिका असल्याने दारूबंदी असलेल्या या गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते. बाहेरील पर्यटकसुद्धा सर्रास परदेशी दारू आणून या परिसरात धिंगाणा करायला लागले आहेत. त्यामुळे इंद्रावती ही नदी प्रदूषित होत आहे. तसेच पामुलगौतम व पर्लकोटा या नद्यांही अस्वच्छ होण्याची भीती आहे. भविष्यात इंद्रावती- पामुलगौतम- पर्लकोटा नद्यांचा त्रिवेणी संगम अस्वच्छ व प्रदूषित होऊ नये म्हणून लोकबिरादरी प्रकल्पातील शाळकरी विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक गावकऱ्यांनी त्रिवणी संगम स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. गंगा वाचवाच्या धर्तीवर ही त्रिवेणी संगम बचाव मोहीम असून यात भामरागड व परिसरातील प्रत्येक नागरिक सहभागी झालेला आहे. या मोहिमेत नदी काठावरील संपुर्ण कचरा गोळा करून तिथेच जाळण्यात आला. तसेच आठवड्यातून एक दिवस विद्यार्थी श्रमदान करून ही मोहीम राबवितात व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडतात. दरम्यान या मोहिमेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा पोलीस दलाने या मोहिमेत सहकार्य करताना किमान देशी- विदेशी दारू या परिसरात येऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे, तेव्हाच हा परिसर स्वच्छ व प्रदूषणमुक्त राहणार आहे. यासाठी भामरागडवासीयही दक्ष झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)