शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:52 IST

ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे.

ठळक मुद्देबाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिपादन : कोरची येथे आदिवासी दिन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे. हा कायदा झाल्याशिवाय येथील नागरिकांचा विकास होणार नाही, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.कोरची येथील राजीव भवनात जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी नांदेड येथील प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. योगीता खानोरकर, प्रभू राजगडकर, रोहिदास राऊत, अ‍ॅड. श्रावण ताराम, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. महेश कोपुलवार, शुभदा देशमुख, कोरचीच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे, सभापती कचरीबाई काटेंगे, डॉ. नंदेश्वर, हंसराज बडोेले, युवा जिल्हाध्यक्ष टेंभूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना बाळासाहेब म्हणाले, घटनेत तरतूद असल्यानुसार ज्या भागात अर्ध्यापेक्षा अधिक लोक एक बोलीभाषेचे असतील, त्यांची राहणी, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचे रितीरिवाज इतरांपेक्षा भिन्न असतील तर त्या भागात स्वायतत्ता प्रस्थापित करणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. एकदा स्वायतत्ता प्रस्थापित झाली की, त्या परिसरातील जल, जंगल, जमीन व इतर संसाधन, साधनसामग्रीवर त्यांचा अधिकार असतो. या परिसरातील लोह खनिजाचा प्रश्न असो की, इतर प्रश्न असोत, सरकारकडे विनवणी करावी लागते. मोठमोठे आंदोलने उभारावी लागतात. एकंदरितच स्वत:च्याच अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वेळ आदिवासींवर येते. आंदोलनासाठी खूप मोठे मनुष्यबळ व पैशाची गरज असते. एवढा पैसा आदिवासी समाजाकडे राहत नाही. त्यामुळे ते आंदोलनही करू शकत नाही. परिणामी शासन किंवा इतर संस्थांकडून अन्याय झाल्यास तो निमूटपणे सहन करावा लागतोे.खोट्या आदिवासींनी खºया आदिवासींच्या सुमारे १ लाख ३२ हजार नोकºया हडपल्या आहेत. आरक्षण संपविले जात आहे. या गंभीर प्रश्नांवर केवळ चर्चा नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आदिवासी पट्ट्यात खनिज संपत्ती असल्याने या भूभागावर अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे आदिवासींनी सावध असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या अ‍ॅड. योगीता खानोरकर, प्रभू राजगडकर, प्रा. डॉ. मेघराज कपूर, डॉ. महेश कोपुलवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार पुष्पलता कुमरे यांचा आदिवासीबांधवांकडून सत्कार करण्यात आला. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले. प्रास्ताविक इजामसाय काटेंगे, प्रा. विनोद कोरेटी तर आभार बाबुराव मडावी यांनी मानले.