शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी स्वतंत्र कायदा करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:52 IST

ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे.

ठळक मुद्देबाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिपादन : कोरची येथे आदिवासी दिन

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : ज्या भागात ५० टक्केपेक्षा जास्त आदिवासी समाज आहे, त्या भागात दार्जिलिंगप्रमाणे स्वतंत्र कायदा असला पाहिजे. हा कायदा झाल्याशिवाय येथील नागरिकांचा विकास होणार नाही, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.कोरची येथील राजीव भवनात जागतिक मूलनिवासी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी नांदेड येथील प्रा. डॉ. मेघराज कपूर होते. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. योगीता खानोरकर, प्रभू राजगडकर, रोहिदास राऊत, अ‍ॅड. श्रावण ताराम, डॉ. सतीश गोगुलवार, डॉ. महेश कोपुलवार, शुभदा देशमुख, कोरचीच्या तहसीलदार पुष्पलता कुमरे, सभापती कचरीबाई काटेंगे, डॉ. नंदेश्वर, हंसराज बडोेले, युवा जिल्हाध्यक्ष टेंभूर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना बाळासाहेब म्हणाले, घटनेत तरतूद असल्यानुसार ज्या भागात अर्ध्यापेक्षा अधिक लोक एक बोलीभाषेचे असतील, त्यांची राहणी, त्यांची जगण्याची पद्धत, त्यांचे रितीरिवाज इतरांपेक्षा भिन्न असतील तर त्या भागात स्वायतत्ता प्रस्थापित करणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. एकदा स्वायतत्ता प्रस्थापित झाली की, त्या परिसरातील जल, जंगल, जमीन व इतर संसाधन, साधनसामग्रीवर त्यांचा अधिकार असतो. या परिसरातील लोह खनिजाचा प्रश्न असो की, इतर प्रश्न असोत, सरकारकडे विनवणी करावी लागते. मोठमोठे आंदोलने उभारावी लागतात. एकंदरितच स्वत:च्याच अधिकारांसाठी संघर्ष करण्याची वेळ आदिवासींवर येते. आंदोलनासाठी खूप मोठे मनुष्यबळ व पैशाची गरज असते. एवढा पैसा आदिवासी समाजाकडे राहत नाही. त्यामुळे ते आंदोलनही करू शकत नाही. परिणामी शासन किंवा इतर संस्थांकडून अन्याय झाल्यास तो निमूटपणे सहन करावा लागतोे.खोट्या आदिवासींनी खºया आदिवासींच्या सुमारे १ लाख ३२ हजार नोकºया हडपल्या आहेत. आरक्षण संपविले जात आहे. या गंभीर प्रश्नांवर केवळ चर्चा नाही तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. आदिवासी पट्ट्यात खनिज संपत्ती असल्याने या भूभागावर अनेकांचे लक्ष आहे. त्यामुळे आदिवासींनी सावध असण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या अ‍ॅड. योगीता खानोरकर, प्रभू राजगडकर, प्रा. डॉ. मेघराज कपूर, डॉ. महेश कोपुलवार यांनी मार्गदर्शन केले.यावेळी तहसीलदार पुष्पलता कुमरे यांचा आदिवासीबांधवांकडून सत्कार करण्यात आला. दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसभेच्या पदाधिकाºयांनी सहकार्य केले. प्रास्ताविक इजामसाय काटेंगे, प्रा. विनोद कोरेटी तर आभार बाबुराव मडावी यांनी मानले.