शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

राष्ट्रीय परिषदेत आदिवासी महिला सरपंच सहभागी होणार

By admin | Updated: April 18, 2016 03:52 IST

ग्राम उदय ते भारत उदय या उपक्रमांतर्गत जागतिक पंचायत दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

गडचिरोली : ग्राम उदय ते भारत उदय या उपक्रमांतर्गत जागतिक पंचायत दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात जिल्ह्यातील २९ अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच सहभागी होणार असून रविवार १७ एप्रिल रोजी त्यांना रवाना करण्यात आले आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच आहेत. यातील निवडक व इच्छूक महिला सरपंचाना पाठविण्यात येत असून त्यांची संपूर्ण व्यवस्था शासनस्तरावरुन करण्यात येणार आहे.या संमेलनात देशभरातील महिला सरपंच सहभागी होणार असून या संमेलनात पंचायत राज व्यवस्थेवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम असून देशभरातील अनुसूचित जमातीच्या महिला सरपंचांना पाचारण करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातून २९ महिला सरपंचांना गडचिरोली पंचायत समितीमधून रवाना करण्यात आले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या महिला सपरंचांच्या चमूला उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) एस. आर. धनकर, देसाईगंजच्या गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भैय्याजी मुद्दमवार, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, ग्रामसेवक जीवनदास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)