शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

राष्ट्रीय परिषदेत आदिवासी महिला सरपंच सहभागी होणार

By admin | Updated: April 18, 2016 03:52 IST

ग्राम उदय ते भारत उदय या उपक्रमांतर्गत जागतिक पंचायत दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन

गडचिरोली : ग्राम उदय ते भारत उदय या उपक्रमांतर्गत जागतिक पंचायत दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ एप्रिल रोजी आंध्रप्रदेश राज्यातील विजयवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात जिल्ह्यातील २९ अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच सहभागी होणार असून रविवार १७ एप्रिल रोजी त्यांना रवाना करण्यात आले आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या महिला सरपंच आहेत. यातील निवडक व इच्छूक महिला सरपंचाना पाठविण्यात येत असून त्यांची संपूर्ण व्यवस्था शासनस्तरावरुन करण्यात येणार आहे.या संमेलनात देशभरातील महिला सरपंच सहभागी होणार असून या संमेलनात पंचायत राज व्यवस्थेवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचा हा उपक्रम असून देशभरातील अनुसूचित जमातीच्या महिला सरपंचांना पाचारण करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यातून २९ महिला सरपंचांना गडचिरोली पंचायत समितीमधून रवाना करण्यात आले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या महिला सपरंचांच्या चमूला उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) एस. आर. धनकर, देसाईगंजच्या गटविकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष भैय्याजी मुद्दमवार, जि.प. कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, ग्रामसेवक जीवनदास ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)