शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी संस्कृती मानवतावादाची जननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:41 IST

पर्यावरण संवर्धन मानवतावाद, स्त्री-पुरूष समानता, समाजवाद आदी विषयांवर आज चर्चा होत असली तरी या सर्व बाबींची जननी आदिवासी संस्कृती आहे,

ठळक मुद्देविजय मानकर यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत मूलनिवासी-आदिवासी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरण संवर्धन मानवतावाद, स्त्री-पुरूष समानता, समाजवाद आदी विषयांवर आज चर्चा होत असली तरी या सर्व बाबींची जननी आदिवासी संस्कृती आहे, असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.रविवारी मूल मार्गावरील लॉनमध्ये मूलनिवासी-आदिवासी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार हिरामन वरखडे, सुखदेव गावळे महाराज, छाया पोटावी, गंगाराम आतला, पुरूषोत्तम निकोडे, हिरा राऊत, प्रा. भगवान नन्नावरे, प्रा. नंदकिशोर रंगारी, रूपेश निमसरकार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना विजय मानकर म्हणाले, संविधानाने आदिवासींना स्वयंकायदा व मालकी हक्क प्रदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या इलाक्यातील जमीन गैरआदिवासी नागरिकांसाठी दिली जाऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याची भाषा करीत असली तरी ते शक्य नाही. संसद कायद्यात फक्तत दुरूस्ती करू शकते. मात्र संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलविण्याचा अधिकार केवळ संविधान सभेला आहे. आदिवासींची संख्या भारतात सर्वाधिक आहे. न्यूझीलंड, आस्ट्रेलिया यासारख्या आदिवासी बहूल देशांची संस्कृती विकसीत आहे, असे मार्गदर्शन विजय मानकर यांनी केले.माजी आमदार हिरामण वरखडे यांनी मार्गदर्शन करताना वनाधिकार कायदा व पेसा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात व देशात आघाडीवर आहे. ग्रामसभांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून प्रगती साधली आहे. नियोजनबध्द योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याने गावाचा विकास शक्य झाले आहे. आदिवासी संस्कृती ही समृध्द संस्कृती आहे. युध्द हे सामाजिक वेडेपण आहे. युध्दामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. शांततेच्या मार्गाने चालून विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार हिरामण वरखडे यांनी केले.आदिवासी नृत्य सादर करून विजय मानकर यांचे स्वागत करण्यात आले.