शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

आदिवासी संस्कृती मानवतावादाची जननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:41 IST

पर्यावरण संवर्धन मानवतावाद, स्त्री-पुरूष समानता, समाजवाद आदी विषयांवर आज चर्चा होत असली तरी या सर्व बाबींची जननी आदिवासी संस्कृती आहे,

ठळक मुद्देविजय मानकर यांचे प्रतिपादन : गडचिरोलीत मूलनिवासी-आदिवासी संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पर्यावरण संवर्धन मानवतावाद, स्त्री-पुरूष समानता, समाजवाद आदी विषयांवर आज चर्चा होत असली तरी या सर्व बाबींची जननी आदिवासी संस्कृती आहे, असे प्रतिपादन आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय मानकर यांनी केले.रविवारी मूल मार्गावरील लॉनमध्ये मूलनिवासी-आदिवासी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार हिरामन वरखडे, सुखदेव गावळे महाराज, छाया पोटावी, गंगाराम आतला, पुरूषोत्तम निकोडे, हिरा राऊत, प्रा. भगवान नन्नावरे, प्रा. नंदकिशोर रंगारी, रूपेश निमसरकार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना विजय मानकर म्हणाले, संविधानाने आदिवासींना स्वयंकायदा व मालकी हक्क प्रदान केले आहे. त्यामुळे त्यांच्या इलाक्यातील जमीन गैरआदिवासी नागरिकांसाठी दिली जाऊ शकत नाही. भारतीय जनता पार्टी संविधान बदलण्याची भाषा करीत असली तरी ते शक्य नाही. संसद कायद्यात फक्तत दुरूस्ती करू शकते. मात्र संविधान बदलू शकत नाही. संविधान बदलविण्याचा अधिकार केवळ संविधान सभेला आहे. आदिवासींची संख्या भारतात सर्वाधिक आहे. न्यूझीलंड, आस्ट्रेलिया यासारख्या आदिवासी बहूल देशांची संस्कृती विकसीत आहे, असे मार्गदर्शन विजय मानकर यांनी केले.माजी आमदार हिरामण वरखडे यांनी मार्गदर्शन करताना वनाधिकार कायदा व पेसा अधिकार कायद्याची अंमलबजावणी करण्यात गडचिरोली जिल्हा राज्यात व देशात आघाडीवर आहे. ग्रामसभांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून प्रगती साधली आहे. नियोजनबध्द योजनांची अंमलबजावणी केली जात असल्याने गावाचा विकास शक्य झाले आहे. आदिवासी संस्कृती ही समृध्द संस्कृती आहे. युध्द हे सामाजिक वेडेपण आहे. युध्दामुळे मोठ्या प्रमाणात हानी होते. शांततेच्या मार्गाने चालून विकास केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार हिरामण वरखडे यांनी केले.आदिवासी नृत्य सादर करून विजय मानकर यांचे स्वागत करण्यात आले.