शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एटापल्लीत वृक्ष लागवड योजनेचा उडाला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 00:23 IST

१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देलागवड न केल्याने रोपटे वाळले : पंचायत समिती कार्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती प्रशासनाकडे लागवडीसाठी रोपटे उपलब्ध होऊनही या रोपट्याची लागवड करण्यात आली नाही. परिणामी पं.स.च्या परिसरात ५० पेक्षा अधिक रोपटे वाळून नष्ट झाले आहेत.संपूर्ण राज्य हरीत करण्याच्या उद्देशाने राज्याचे वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात आली. पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात खड्डे खोदून विविध रोपट्यांची लागवड करण्यात आली. राज्य शासनाच्या या मोहिमेअंतर्गत एटापल्ली पंचायत समितीला २६० रोपट्यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वनविभागाकडून २६० रोपटे उपलब्ध झाले. यापैकी पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने १८३ रोपटे लावण्यात आले. उर्वरित रोपटे पं.स.परिसरातील शौचालयाजवळ तसेच मिटिंग हॉलच्या मागील परिसरात ठेवण्यात आले. सदर मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी तीन हजार रूपयांची वर्गणी जमा करण्यात आली. तर मजुरांच्या मजुरीची रक्कम शासकीय निधीतून अदा करण्यात आली. पं.स.यंत्रणेच्या वतीने वृक्षलागवड कार्यक्रमाचा कांगावा करण्यात आला. मात्र या यांत्रणेच्या वतीने लावण्यात आलेल्या एकूण झाडापैकी सद्य:स्थितीत एकही झाड जीवंत स्थितीत दिसून येत नाही.वृक्ष लागवडीसाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले. मात्र वृक्षरोपणाबाबतची खबरदारी वनविभाग व पं.स. प्रशासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे ५० वर रोपटे कार्यालय परिसराच्या आवारात पडून राहिले. सदर रोपटे वाळून ती नष्टही झाली आहेत. प्रशासकीय अधिकारी, पं.स.चे लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेचा फज्जा उडाला. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने उद्देशाला हडताळ फासला आहे.मूल्यमापन व देखरेखीचे काम थंडबस्त्यात१३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात साडेपाच लाख वर रोपट्यांची विविध ठिकाणी लागवड करण्यात आली. यामध्ये सर्वच प्रशासकीय विभागांचा समावेश होता. अहेरी उपविभागातही वृक्ष लागवड मोहिमेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र लागवडीनंतर संगोपन, देखरेखीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले. दर दोन ते तीन महिन्यांनी या योजनेचा आढावा घेण्याचे राज्य शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. किती रोपटे लावले, किती जिवंत व किती नष्ट झाले याबाबतचा अहवाल तयार होणार होता. मात्र अनेक विभागांनी अशा प्रकारची माहिती तयार केली नाही. वृक्ष लागवड मूल्यमापनाचे काम थंडबस्त्यात आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग