शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वृक्ष लागवड कार्यक्रमाचा जिल्ह्यात उडाला फज्जा

By admin | Updated: July 7, 2016 01:25 IST

यंदा राज्य शासनाच्या वतीने वनमहोत्सवाअंतर्गत राज्यभरात दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

यंदा राज्य शासनाच्या वतीने वनमहोत्सवाअंतर्गत राज्यभरात दोन कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमाची गडचिरोली जिल्ह्यातही अंमलबजावणी करण्यात आली. १ जुलै रोजी जिल्ह्याच्या सर्व दूर भागात सात लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली; मात्र लावण्यात आलेल्या वृक्षांना पिंजरे बसविण्यात आले नाही. तसेच काटेरी कुंपणही करण्यात आले नाही. त्यामुळे लावण्यात आलेली अनेक झाडे दुसऱ्याच दिवशी मोकाट जनावरांनी फस्त केले. एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयाला ५० झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने वसाहत व रुग्णालय परिसरात वृक्षांची लागवड केली. आरोग्य कर्मचारी वसाहतीत लावण्यात आलेल्या झाडांना कुंपण करण्यात आले नाही. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी मोकाट जनावरांनी लावलेली वृक्ष फस्त केली. त्यामुळे पाने विरहीत झाडे उरली आहे. कुंपणाअभावी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा जिल्ह्यात फज्जा उडाला आहे.