शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

स्मशानभूमीला कचऱ्याचा वेढा

By admin | Updated: June 20, 2017 00:44 IST

आरमोरी शहराजवळ रामाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे.

दुर्गंधीचा त्रास : आरमोरी नगर पंचायतचे दुर्लक्ष; आंदोलनाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहराजवळ रामाळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढला आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तत्काळ विल्हेवाट लावावी, त्याचबरोबर या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी होत आहे.रामाळा नदीघाट रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत शहरातील बौद्ध बांधव तसेच इतर समाजातील नागरिक दफनविधी करतात. शहरातील कचरा या स्मशानभूमीत टाकण्यात येत असल्याने स्मशानभूमीचा परिसर हा पूूर्णत: कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात अत्यंयात्रेतील नागरिकांना कचऱ्यामुळे दुगंर्धीचा त्रास सहन करावा लागते. मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदणाऱ्यांनासुद्धा दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. नगर पंचायत प्रशासनाने स्मशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची उचल करून साफसफाई करावी, याबाबत नगर पंचायत प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.नगर पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्मनशानभूमीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांची तत्काळ उचल करावी व कचरा टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. तसेच स्मशानभूमी परिसराची साफसफाई करून पाणी, विद्युत व शेडचे बांधकाम करण्यात यावे, जेणेकरून अत्यंविधीतील नागरिकांना शोकसभा घेणे सोईचे होईल. स्मशानभूमीतील दुर्गंधीपासून तत्काळ मुक्तता करावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष हसंराज बडोले यांनी दिला आहे. नगर परिषदेचे नियंत्रण न राहिल्यास या ठिकाणाची डम्पींग यार्डप्रमाणे परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच लक्ष देण्याची मागणी आहे.