शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावात शिकारीसाठी सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:24 IST

देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे.

ठळक मुद्देवन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष : पाण्याजवळ तयार केली झाडाच्या फांद्यांची झोपडी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे. या ठिकाणी दरदिवशी एका प्राण्याची शिकार होत असताना या परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.एप्रिल महिन्यापासून जंगलातील पाणवठे आटण्यास सुरूवात झाली आहे. वन विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी वन्यजीवांनी गावाजवळ असलेल्या तलावांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. देसाईगंज तालुकास्थळापासून पूर्वेला अवघ्या आठ किमी अंतरावर शंकरपूर गावाजवळ तलाव आहे. या तलावात वन्यजीवांच्या शिकारीसाठी सायंकाळच्या सुमारास खुलेआम सापळे लावले जात आहेत. त्याचबरोबर डोंगरमेंढा येथेही तलावात सापळे लावले जात आहेत.प्राण्यांना दिसू नये, यासाठी जलसाठ्याजवळच झाडाच्या फांद्यांच्या झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांमध्ये शिकारी लपून राहतात. वन्यजीव रात्री पाण्यासाठी आल्यानंतर सापळ्यात अडकतो. त्यानंतर शिकारी सदर प्राण्यास मारून त्याच्या मांसाची विक्री करतात. विशेष म्हणजे, तलावाच्या पाळीवर उभे झाले तरी शिकाऱ्यांनी तलावात बांधलेल्या झोपड्या नजरेस पडतात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र या झोपड्या कशा दिसत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन विभागाचे कर्मचारी शिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन चूप असल्याचे बोलले जात आहे.वन कर्मचाऱ्यांची जंगल गस्त कागदोपत्रीचवन्यजीवांची शिकार होऊ नये, त्याचबरोबर जंगलतोड होऊ नये यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्याला जंगलात गस्त घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र बहुतांश वन कर्मचारी गस्तीच्या नावावर घरी जाऊन झोपा काढत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. प्रत्येक कर्मचारी जंगलात गस्त घालतो काय, याचा दरदिवशी आढावा घेणे आवश्यक आहे.