शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावात शिकारीसाठी सापळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:24 IST

देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे.

ठळक मुद्देवन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष : पाण्याजवळ तयार केली झाडाच्या फांद्यांची झोपडी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील डोंगरमेंढा व शंकरपूर येथील तलावांमध्ये वन्यजीवांच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांनी सापळे रचले आहेत. वन्यजीवांची शिकार करताना लपून बसण्यासाठी तलावात पाण्याच्या जवळ झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली आहे. या ठिकाणी दरदिवशी एका प्राण्याची शिकार होत असताना या परिसरातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.एप्रिल महिन्यापासून जंगलातील पाणवठे आटण्यास सुरूवात झाली आहे. वन विभागाने कृत्रिम पाणवठे तयार केले असले तरी या पाणवठ्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. त्यामुळे पाण्यासाठी वन्यजीवांनी गावाजवळ असलेल्या तलावांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. याचा गैरफायदा शिकाऱ्यांनी घेण्यास सुरूवात केली आहे. देसाईगंज तालुकास्थळापासून पूर्वेला अवघ्या आठ किमी अंतरावर शंकरपूर गावाजवळ तलाव आहे. या तलावात वन्यजीवांच्या शिकारीसाठी सायंकाळच्या सुमारास खुलेआम सापळे लावले जात आहेत. त्याचबरोबर डोंगरमेंढा येथेही तलावात सापळे लावले जात आहेत.प्राण्यांना दिसू नये, यासाठी जलसाठ्याजवळच झाडाच्या फांद्यांच्या झोपड्या बांधल्या आहेत. या झोपड्यांमध्ये शिकारी लपून राहतात. वन्यजीव रात्री पाण्यासाठी आल्यानंतर सापळ्यात अडकतो. त्यानंतर शिकारी सदर प्राण्यास मारून त्याच्या मांसाची विक्री करतात. विशेष म्हणजे, तलावाच्या पाळीवर उभे झाले तरी शिकाऱ्यांनी तलावात बांधलेल्या झोपड्या नजरेस पडतात. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मात्र या झोपड्या कशा दिसत नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन विभागाचे कर्मचारी शिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन चूप असल्याचे बोलले जात आहे.वन कर्मचाऱ्यांची जंगल गस्त कागदोपत्रीचवन्यजीवांची शिकार होऊ नये, त्याचबरोबर जंगलतोड होऊ नये यासाठी प्रत्येक वन कर्मचाऱ्याला जंगलात गस्त घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र बहुतांश वन कर्मचारी गस्तीच्या नावावर घरी जाऊन झोपा काढत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. प्रत्येक कर्मचारी जंगलात गस्त घालतो काय, याचा दरदिवशी आढावा घेणे आवश्यक आहे.