शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सापळ्यांमुळे पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: May 8, 2017 01:40 IST

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे पक्षी निसर्गातील सौंदर्य व अस्तित्व राखण्यात मोलाची भूमिका बजावितात.

शिकारी वाढल्या : नदी, नाले, पाणवठ्यांवर पसरवितात जाळे लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे पक्षी निसर्गातील सौंदर्य व अस्तित्व राखण्यात मोलाची भूमिका बजावितात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात पक्ष्यांची सापळा रचून शिकार होत असल्याने पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मात्र पक्ष्यांचा बचाव करण्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष आहे. वनविभाग केवळ तेंदूपत्ता बोनस व गॅस वितरणातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. वनाचे व वन्यजीवांचे रक्षण करण्याचे अधिकार ज्यांना दिले आहे. ते जर उघड्या डोळ्यांनी वन व वन्यजीवांचा ऱ्हास पाहत असतील तर जीवांचे रक्षण करणार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. गावपातळीवर वन व वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जबाबदारी संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांवर सोपविण्यात आली आहे. परंतु वनव्यवस्थापन समित्या अकार्यक्षम झाल्या आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त प्रमाणात वन्यप्राणी व पक्ष्यांचे निवारे नष्ट केल्या जात आहेत. उन्हाळ्याचा तडाखा अधिक असल्याने एप्रिल महिन्यातच जंगलातील पाणवठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे जंगलातील प्राणी व पक्षीही गावाकडे धाव घेत आहेत. पाण्याच्या शोधार्थ प्राणी व पक्ष्यांचीही भटकंती होत आहे. गावाच्या आसपास असलेल्या तलाव, नदी, नाल्याच्या काठी सापळे रचून प्राणी व पक्ष्यांचीही शिकार होत आहे. अनेकदा वन्यप्राण्यांच्या शिकारी रात्रीच्या सुमारासही केल्या जातात. अनेक प्रकारची शक्कल लढवून प्राण्यांची शिकार केली जाते. परंतु शिकाऱ्यांकडे वनविभाग दुर्लक्ष करीत असल्याने कोणतीच कारवाई केली जात नाही. गावातील वनसमित्या केवळ नावापुरत्याच असल्याने जंगलातील जीव तर नष्ट होतच आहे. शिवाय अवैध वृक्षतोड, बांबूकटाई होत आहे. त्यामुळे वन्यजीव धास्तावलेले आहेत. वन्यजीव गावांकडे येत असल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पक्ष्यांचे अस्तित्त्व सध्या धोक्यात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात विविध पक्षी आहेत. परंतु विशेषत: ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात शिकारी वाढत असल्याने त्यांचे अस्तित्त्व धोक्यात आहे. पारवा व हारावतांचे प्रमाण घटत आहे पाणवठ्याजवळ असलेल्या झाडांवर मोहाच्या झाडापासून काढलेले चिक ओलसर काडीला चिकटवून मांडले जाते. पाणी पिण्यासाठी येणाऱ्या पारवा, हारावत यासह अन्य पक्ष्यांची शिकार केली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस महाराष्ट्राचा राज्य पक्षी असलेला हारावत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डोंगरी भागात हारावत या पक्ष्याचे वास्तव्य असते. परंतु पाणी पिण्यासाठी हारावत शक्य असलेल्या पाणवठ्यावर जातात. परंतु शिकाऱ्यांकडून पसरविण्यात आलेले सापळे पक्ष्यांच्या जीवांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. जिल्ह्यातील डोंगरी भागात हारावत पक्ष्यांचे अस्तित्व आहे. यासह पारवा पक्ष्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात. परंतु शिकारीचे वाढते प्रमाण बघता अनेक पक्ष्यांच्या जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.