शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

दोन लाख नागरिकांचे प्रथमच बँकेतून व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:16 IST

पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच वर्षातील स्थिती : प्रधानमंत्री जनधन योजनेचे साध्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून सदर नागरिक प्रथमच बँकेसोबत जोडल्या जाऊन त्यांचे व्यवहार बँकेमार्फत सुरू झाले आहे.शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. लाचखोरीला आळा घालण्यासाठी अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. मात्र अनेकांकडे बँक खाते नसल्याने अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शुन्य बचतीवर बँक खाते काढण्याची सक्ती बँकांना केली. प्रत्येक बँकेला बँक खाते काढण्याचे उद्दिष्टसुध्दा निश्चित केले. मागील चार वर्षांपासून याचा केंद्र शासनामार्फत आढावा घेतला जात आहे. योजनेच्या सुरूवातीपासून काही दिवस अगदी आठ दिवसात आढावा घेतला जात असल्याने बँकेची यंत्रणा कामाला लागली होती. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे बँकेचे खाते नसल्याने जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास बराच वाव होता. त्याचा फायदा घेत मागील पाच वर्षात या योजनेंतर्गत २ लाख ३७ हजार २७१ बँक खाती उघडण्यात आली आहेत. योजनेची घोषणा झाल्यानंतर पहिल्या वर्षी बँक कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन या योजनेतंर्गत खाते काढण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर मात्र या योजनेकडे आता शासनासह बँकानीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नवीन खाते काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बँकाची संख्या वाढविण्याची गरजबँकाचे व्यवहार वाढविण्यासाठी जिल्ह्यात बॅँकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, कोरची यासह इतरही तालुक्यांमध्ये लोकसंख्या व भूभागाचा विस्तार या तुलनेत बँकांची संख्या अतीशय कमी आहे. बँकांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.दुर्गम भागातील नागरिक सेवेपासून वंचितगडचिरोली जिल्ह्याचा विस्तार व लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. काही तालुक्यातील गावांपासून बँक ५० ते ६० किमी अंतरावर आहे. दुर्गम भागात वाहतुकीची साधने नाहीत. त्यामुळे ५० किमी अंतरावर जाऊन परत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी अजुनही बँक खाते काढले नाही. बँक खाते नसल्याने निराधार योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यास त्यांना अडचण जात आहे. त्यामुळे बँकांची समस्या वाढविणे गरजेचे आहे.बँकेचे खाते नसल्याने बँकेत बचत करण्यास काहीच मुभा नव्हती. अनेकांना बँकेतून पैसे काढणे व पैसे भरण्याचे व्यवहार समजत नव्हते. जनधनच्या माध्यमातून नागरिकांनी बँकेचे खाते काढले. खाते झाल्यामुळे आता नागरिकांना बँकेचे व्यवहार कळण्यास सुरूवात झाली आहे. तसेच बँक खात्यात काही प्रमाणात बचतसुध्दा केली जात आहे. या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागली आहे. जनधन योजनेचा हा सर्वात मोठा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे.