शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

दोन लाख नागरिकांचे प्रथमच बँकेतून व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:16 IST

पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच वर्षातील स्थिती : प्रधानमंत्री जनधन योजनेचे साध्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाच वर्षांपूर्वी, म्हणजे १५ आॅगस्ट २०१४ रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला गडचिरोलीसारख्या दुर्गम क्षेत्रातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेंतर्गत दुर्गम व ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३७ हजार २७१ नागरिकांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या माध्यमातून सदर नागरिक प्रथमच बँकेसोबत जोडल्या जाऊन त्यांचे व्यवहार बँकेमार्फत सुरू झाले आहे.शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. लाचखोरीला आळा घालण्यासाठी अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. मात्र अनेकांकडे बँक खाते नसल्याने अनुदानाची रक्कम जमा करण्यास अडथळा निर्माण होत होता. यावर उपाय म्हणून शासनाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शुन्य बचतीवर बँक खाते काढण्याची सक्ती बँकांना केली. प्रत्येक बँकेला बँक खाते काढण्याचे उद्दिष्टसुध्दा निश्चित केले. मागील चार वर्षांपासून याचा केंद्र शासनामार्फत आढावा घेतला जात आहे. योजनेच्या सुरूवातीपासून काही दिवस अगदी आठ दिवसात आढावा घेतला जात असल्याने बँकेची यंत्रणा कामाला लागली होती. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांकडे बँकेचे खाते नसल्याने जनधन योजनेंतर्गत बँक खाते उघडण्यास बराच वाव होता. त्याचा फायदा घेत मागील पाच वर्षात या योजनेंतर्गत २ लाख ३७ हजार २७१ बँक खाती उघडण्यात आली आहेत. योजनेची घोषणा झाल्यानंतर पहिल्या वर्षी बँक कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन या योजनेतंर्गत खाते काढण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर मात्र या योजनेकडे आता शासनासह बँकानीही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नवीन खाते काढण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.बँकाची संख्या वाढविण्याची गरजबँकाचे व्यवहार वाढविण्यासाठी जिल्ह्यात बॅँकांची संख्या वाढविण्याची गरज आहे. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, कोरची यासह इतरही तालुक्यांमध्ये लोकसंख्या व भूभागाचा विस्तार या तुलनेत बँकांची संख्या अतीशय कमी आहे. बँकांची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.दुर्गम भागातील नागरिक सेवेपासून वंचितगडचिरोली जिल्ह्याचा विस्तार व लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. काही तालुक्यातील गावांपासून बँक ५० ते ६० किमी अंतरावर आहे. दुर्गम भागात वाहतुकीची साधने नाहीत. त्यामुळे ५० किमी अंतरावर जाऊन परत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी अजुनही बँक खाते काढले नाही. बँक खाते नसल्याने निराधार योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यास त्यांना अडचण जात आहे. त्यामुळे बँकांची समस्या वाढविणे गरजेचे आहे.बँकेचे खाते नसल्याने बँकेत बचत करण्यास काहीच मुभा नव्हती. अनेकांना बँकेतून पैसे काढणे व पैसे भरण्याचे व्यवहार समजत नव्हते. जनधनच्या माध्यमातून नागरिकांनी बँकेचे खाते काढले. खाते झाल्यामुळे आता नागरिकांना बँकेचे व्यवहार कळण्यास सुरूवात झाली आहे. तसेच बँक खात्यात काही प्रमाणात बचतसुध्दा केली जात आहे. या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागली आहे. जनधन योजनेचा हा सर्वात मोठा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना झाला आहे.