शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

वाहतूक दिवे पुन्हा सुरू होणार

By admin | Updated: March 5, 2017 01:22 IST

मागील तीन वर्षांपासून बंद असलेले शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे दुरूस्त झाले असून

दिव्यांची दुरूस्ती पूर्ण: मागील तीन वर्षांपासून होते बंद गडचिरोली : मागील तीन वर्षांपासून बंद असलेले शहरातील इंदिरा गांधी चौकातील वाहतूक दिवे दुरूस्त झाले असून या दिव्यांची शनिवारी ११.३० वाजता चाचणी घेण्यात आली असता दिवे सुरू झाले; मात्र या दिव्यांमध्ये टाईम सेटिंग नसल्याने सदर टाईम सेटिंग करून वाहतूक दिवे सोमवारी पूर्ववत सुरू केले जाणार आहेत. बल्लारपूर पेपरमिलच्या सीएसआर निधीतून इंदिरा गांधी चौकात पाच वर्षांपूर्वी वाहतूक दिवे बसविण्यात आले होते. मात्र त्यानंतर वाहतूक दिवे अगदी दीड ते दोन वर्षातच बंद पडले. तेव्हापासून सदर वाहतूक दिवे जवळपास तीन वर्षांपासून बंदच होते. सदर वाहतूक दिवे दुरूस्त करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी नगर परिषदेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षात नगरोत्थान योजनेतून २ लाख ४१ हजार ४४० रूपये मंजूर केले. या निधीतून नगर परिषदेने वाहतूक दिव्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. मागील एक महिन्यापासून सदर काम केले जात होते. चारही वाहतूक दिव्यांसाठी भूमिगत वायर टाकण्यात आले आहेत. या वायरमध्ये बिघाड निर्माण झाला होता तर काही वायर तुटले होते. चारही बाजुला खड्डे खोदून वायर दुरूस्त करण्यात आले. त्यानंतर सदर वाहतूक दिवे शनिवारी सुरू केले. चारही मार्गावरील वाहतूक दिवे सुरू झाले. मात्र सदर वाहतूक दिव्यांमध्ये टाईम सेटिंगची समस्या निर्माण झाली आहे. केवळ १५ सेकंदाच्या अंतराने वाहतूक दिवे चालूबंद होतात. १५ सेकंद हा अतिशय कमी वेळ आहे. त्यामुळे यामध्ये बदल करून किमान दोन ते तीन मिनिटांचा टाईम सेट करावा लागणार आहे. यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्याला बोलविले जाणार असून सोमवारपासून सदर वाहतूक दिवे पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)