शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

अर्धवट पूल बांधकामामुळे रहदारी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरातील टेकडा-पर्सेवाडा मार्गावरील पुलाचे काम अर्धवटच असल्याने या मार्गावरील रहदारी ...

सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरातील टेकडा-पर्सेवाडा मार्गावरील पुलाचे काम अर्धवटच असल्याने या मार्गावरील रहदारी बंदच आहे. त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रेगुंठा परिसरात ये-जा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. यामध्ये पहिला मार्ग टेकडा-पर्सेवाडा व दुसरा मार्ग बेज्जूरपल्ली आहे. या दोन्ही मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. दरवर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, मात्र कंत्राटदार आपल्या मर्जीने थातूरमातूर काम करून बिल उचलतात, असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या या परिसरात घनदाट जंगल आहे. परंतु पक्के रस्ते अद्यापही निर्माण झाले नाही. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर टेकडा-पर्सेवाडा मार्गाच्या डांबरीकरणास मंजुरी मिळाली. २०१७-१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मंजुरी मिळूनही कामाने मात्र वेग पकडला नाही. मागील तीन वर्षापासून या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र कंत्राटदाराने बांधकाम अर्धवट ठेवले आहे. पूर्ण बांधकाम न झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. रेगुंठा परिसरात रेगुंठा, कोटापल्ली, नरसिंहापल्ली, कोत्तूर, येला, मुलादिम्या, मोयाबीनपेठ, बोकाटगुद्दाम, दर्सेवाडा, पर्सेवाडा, चिट्याला आदी १९ गावांचा समावेश आहे. या परिसरातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी बेज्जूरपल्ली मार्गावरून आवागमन करावे लागते. मात्र बेज्जूरपल्ली मार्गाने तब्बल २५ किमी जास्तीचे अंतर प्रवास करावा लागताे. टेकडा-पर्सेवाडा मार्गावर बांधकाम पूर्ण झाल्यास रेगुंठा परिसरातील लोकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. या भागातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.