लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या दुकानदारांनी समोरच्या भागात अतिक्रमण केले. शिवाय रस्त्याच्या कडेला चारचाकी व दुचाकी वाहने उभी ठेवली जातात. परिणामी मुख्य मार्ग अरूंद बनला. त्यामुळे या मार्गावर बऱ्याचदा वाहतूक विस्कळीत होत असते.सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सिरोंचा येथे राज्य शासनाच्या वतीने नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. मात्र ज्या गतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती तशी गती व बदल शहरात दिसून येत नाही. परिणामी शहराच्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर मार्गावरून आवागमन करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सिरोंचा शहरात बँक आॅफ इंडिया शाखेच्या समोर पार्र्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर तसेच जागा मिळेल त्या ठिकाणी ठेवतात. त्यामुळे मुख्य मार्ग अरूंद बनला आहे. शहराच्या मुख्य मार्गावरच बाजारपेठ असल्याने मोठी अवजड वाहने येथून आवागमन करतात. तसेच या मार्गावर मटन मार्केट आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. अनेक वाहनधारक आपली दुचाकी वाहने रस्त्यावर उभी करीत असतात. परिणामी रस्ता अरूंद बनत आहे.नगरम चौक ते सिरोंचा शहर तसेच बसस्थानक मार्गसुद्धा अरूंद झाला असून या मार्गाने तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून येणाºया लहान-मोठ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सदर मार्गाचे रूंदीकरण व मजबुतीकरण करणे गरजेचे आहे, तशी मागणीही होत आहे. राज्य शासन, प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सिरोंचा शहराच्या विकासासाठी रस्ते, नाली बांधकाम व इतर ठोस कामांचे नियोजन करावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
पार्किंग अभावी वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST
सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सिरोंचा येथे राज्य शासनाच्या वतीने नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. मात्र ज्या गतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती तशी गती व बदल शहरात दिसून येत नाही. परिणामी शहराच्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर मार्गावरून आवागमन करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पार्किंग अभावी वाहतुकीस अडथळा
ठळक मुद्देप्रशासनाच्या वतीने कारवाई नाही : सिरोंचा शहरातील मुख्य मार्ग बनला अरूंद