शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

नळ योजनेतील पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने टाकले विषारी द्रव्य

By admin | Updated: June 20, 2016 01:05 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कुलकुली ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास विषारी द्रव्य ...

कुलकुली येथील घटना : संपूर्ण गावाला संपविण्याचा प्रयत्न अयशस्वी; ग्रामपंचायततर्फे मालेवाडा पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखलआरमोरी : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत कुलकुली ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक नळ योजनेच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास विषारी द्रव्य टाकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. सकाळी नळातून येणाऱ्या पाण्याचा अनैसर्गिक वास येत असल्याचे लक्षात येताच तत्काळ ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा बंद करून पाणी न पिण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या. त्यामुळे फार मोठी जीवितहानी टळलीतपासणीसाठी पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठविलेनळाचे सदर बाधित पाणी पिल्याने गावातील दोन ते तीन इसमांना उलटी व डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती ठिक झाली. नळाच्या पाण्याने शिजविलेले अन्न खड्डा खोदून गाडण्यात आले. विषारी द्रव्याने बाधित झालेले २५ हजार लिटर पाणी जमिनीत सोडण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल आल्यानंतर पाण्यातील विषारी द्रव्य नेमके कोणते हे कळणार आहे.आरोपीला तत्काळ अटक करासदर घटनेची माहिती मिळताच पिसेवडधाचे मंडळ अधिकारी व भाकरोंडीचे तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. पाण्याच्या टाकीची पाहणी करून कुलकुलीच्या सरपंच बेबी मडावी, उपसरपंच जितेंद्र रामटेके, ग्रामसेवक निलेश जौंजाळकर, रामदास उईके, तंमुस अध्यक्ष लक्ष्मण उईके व ग्रा.पं. सदस्यांच्या उपस्थित पंचनामा केला. गावकऱ्यांच्या जिवनाशी खेळ करणाऱ्या आरोपीचा तत्काळ शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी ग्रा.पं. पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे.सदर घटनेने संपूर्ण गावाला संपविण्याचा प्रयत्न झाल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कुलकुली ग्रामपंचायतीने मालेवाडा पोलीस मदत केंद्रात तक्रार दाखल केली आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या कुलकुली ग्रा.पं.तर्फे गावाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जि.प. शाळेच्या परिसरात ४० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी उभारण्यात आली. फेब्रुवारीपासून गावात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. खासगी नळधारकही या योजनेच्या पाण्याचा उपयोग करतात. दरम्यान अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास पाण्याच्या या टाकीत विषारी द्रव्य टाकून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ग्रा.पं.च्या कर्मचाऱ्यांनी नळाला पाणी सोडले. दरम्यान पाण्यातून अनैसर्गिक स्वरूपाचा वास येऊ लागला. गावकऱ्यांना पाण्याची शहानिशा केली असता, पाण्यात विषारी द्रव्य मिसळल्याचे निदर्शनास आले. लगेच पाणी पुरवठा बंद करून तत्काळ गावात फिरून नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या. त्यामुळे मोठी प्राणहानी टाळता आली. ग्रा.पं.तर्फे पाणी टाकी शुध्दीकरणाचे काम सुरू आहे. या घटनेसंदर्भात ग्रा.पं.ने मालेवाडा पोलीस मदत केंद्रात अज्ञात इसमाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. (वार्ताहर)