शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती; युद्धविरामानंतर शरद पवारांचं भाष्य
6
कडक सॅल्यूट! "डॅडी... मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

शौचालयाच्या कामात अहेरी, एटापल्ली तालुके माघारले

By admin | Updated: January 15, 2017 01:27 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात

बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतचा अल्टीमेटम : जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कारवाईचे संकेत गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले आहेत. यापैकी १५ हजार २६४ शौचालय पूर्ण झाले आहेत. अहेरी व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक शौचालय अपूर्ण स्थितीत असून हे तालुके शौचालय बांधकामात माघारले आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अहेरी तालुक्याला ४ हजार २९३ व एटापल्ली तालुक्याला २ हजार ८३० वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षात प्रशासनाला दिले आहेत. यापैकी आतापर्यंत अहेरी तालुक्यात १२०० तर एटापल्ली तालुक्यात १ हजार १३० शौचालयाचे काम पूर्ण झाले आहेत. अद्यापही अहेरी तालुक्यात ३ हजार ९३ व एटापल्ली तालुक्यात १ हजार ७०० शौचालयाचे काम अपूर्ण आहे. ३१ मार्च २०१७ पर्यंत सर्व शौचालयाचे काम पूर्ण करून शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला आहे. या संदर्भात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनीही सर्व ग्रामसेवकांना ३१ मार्च २०१७ पर्यंत शौचालयाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च २०१७ पर्यंत गावातील शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी दिले आहेत. संपूर्ण बाराही तालुक्यात आतापर्यंत ५० टक्के पेक्षा कमी शौचालयाचे काम पूर्ण झाले आहेत. उर्वरित १८ हजार ९८१ शौचालयाचे काम येत्या अडीच महिन्यात पूर्ण करण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात शौचालयाच्या कामात गती नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी) ७ हजार ४२५ लाभार्थ्यांना ८९१ लाख रूपये अनुदान वाटप स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम हाती घेतलेल्या तसेच पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील जवळपास ७ हजार ४२५ लाभार्थ्यांना ८९१ लाख रूपयांचे अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ६८.२८ लाख, आरमोरी तालुक्यातील लाभार्थ्यांना ५७.१२ लाख, भामरागड ४३.२० लाख, चामोर्शी १२६.१२ लाख, धानोरा १०९.३२ लाख, एटापल्ली ४०.५६ लाख, गडचिरोली ९९.४८ लाख, कोरची ९७.६८ लाख, कुरखेडा ५३.७६ लाख, मुलचेरा ९६.७२ लाख तर सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांना ९८.७६ लाख रूपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. अनुदान मिळूनही काही लाभार्थी शौचालयाच्या कामात दिरंगाई करीत आहेत.