शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

By admin | Updated: February 25, 2017 01:22 IST

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील

गडचिरोली येथे : पत्रकार परिषदेत माहिती; शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणार चर्चा गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते राहणार असून उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे राहतील. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे. परंतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह होत नाही. तसेच उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर सानप, कृषी अर्थतज्ज्ञ संजय पानसे, नगराध्यक्ष योगीता पिपरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजेपर्यंत ‘भारतीय शेतीची पराधिनता’ या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्वामीनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था, रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत शेतकरीविरोधी कायद्यांचा परिचय, रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता प्रकट मुलाखत, १०.१५ वाजता पारंपरिक कथा, लोकगीते, ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन, दुपारी ११.४५ वाजता शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी यशोगाथांचे गौडबंगाल, दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता समारोप व पुरस्कारांचे वितरण केले जाईल. समारोपीय कार्यक्रमाला शेतकरी नेते अ‍ॅॅड. वामनराव चटप, अनिल घनवट, राजेंद्रसिंह ठाकूर उपस्थित राहणार आहेत. शेती आणि शेतकरी या विषयावर विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाधर मुटे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला अशोक गडकरी, ईश्वर मत्ते, सुरेश शेंडे, गणेश मुटे, विनोद काळे उपस्थित होते.