शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

By admin | Updated: February 25, 2017 01:22 IST

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील

गडचिरोली येथे : पत्रकार परिषदेत माहिती; शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणार चर्चा गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते राहणार असून उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे राहतील. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे. परंतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह होत नाही. तसेच उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर सानप, कृषी अर्थतज्ज्ञ संजय पानसे, नगराध्यक्ष योगीता पिपरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजेपर्यंत ‘भारतीय शेतीची पराधिनता’ या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्वामीनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था, रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत शेतकरीविरोधी कायद्यांचा परिचय, रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता प्रकट मुलाखत, १०.१५ वाजता पारंपरिक कथा, लोकगीते, ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन, दुपारी ११.४५ वाजता शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी यशोगाथांचे गौडबंगाल, दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता समारोप व पुरस्कारांचे वितरण केले जाईल. समारोपीय कार्यक्रमाला शेतकरी नेते अ‍ॅॅड. वामनराव चटप, अनिल घनवट, राजेंद्रसिंह ठाकूर उपस्थित राहणार आहेत. शेती आणि शेतकरी या विषयावर विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाधर मुटे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला अशोक गडकरी, ईश्वर मत्ते, सुरेश शेंडे, गणेश मुटे, विनोद काळे उपस्थित होते.