शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

आज जागविणार कारगिल विजयाच्या स्मृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 01:07 IST

भारतवर्षाला गौरवान्वित करणारा व देशभक्ती व देशप्रेमाने उर दाटून येणारा विजयोत्सव देशाने १९ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी कारगिल युद्धातील विजयाने अनुभवला. देशप्रेम व देशभक्तीचा हा विजयोत्सव गडचिरोली शहरात दरवर्षी अखंडितपणे साजरा केला जात आहे. या विजयाच्या स्मृतींना गुरूवारी उजाळा दिला जाणार आहे.

ठळक मुद्दे१९ वर्षांपासून विजयोत्सव : देशभक्ती, देशप्रेम निर्माण करण्याची नि:स्वार्थ भावना

गोपाल लाजूरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारतवर्षाला गौरवान्वित करणारा व देशभक्ती व देशप्रेमाने उर दाटून येणारा विजयोत्सव देशाने १९ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी कारगिल युद्धातील विजयाने अनुभवला. देशप्रेम व देशभक्तीचा हा विजयोत्सव गडचिरोली शहरात दरवर्षी अखंडितपणे साजरा केला जात आहे. या विजयाच्या स्मृतींना गुरूवारी उजाळा दिला जाणार आहे.१९९९ मध्ये कारगिल युद्धाच्या प्रसंगी पाकिस्तान विरूद्ध भारतातील जनमाणसात चीड व द्वेषाची भावना निर्माण झाली असतानाच गडचिरोली शहरसुद्धा माध्यम होते. शहरात सामाजिक कार्यकर्त्यांकडून देशभक्ती व देशप्रेमाची भावना समाजात निर्माण करण्याचे काम सुरू होते. भारत देशाने मोठ्या ताकदीने पाकिस्तानचे आक्रमण परतून लावून त्यांना पराभूत केल्यानंतर देशात आनंद व उत्साहाची लाट पसरली. यापासून गडचिरोली शहर सुद्धा सुटले नाही. विजयानंतर तीन महिन्याने शहरात दुर्गादेवी उत्सव आला. या उत्सवात दुर्गादेवीचा देखावा साकारण्यात आला. परंतु हा देखावा सर्वसाधारण नव्हता. पहिल्यांदाच जिवंत देखावा साकारण्यात आला. या देखाव्यामध्ये भारतीय सैन्य व पाकिस्तानच्या सैन्यातील युद्ध, तोफ, रणगाडा, हेलिकॉप्टर आदींचा समावेश होता. देखावा इतका प्रसिद्ध झाला होता. जिल्हाभरातून प्रेक्षकांची गर्दी देखावा बघण्यासाठी चंद्रपूर रोडलगत बाजार परिसरात उसळत होती. जिल्ह्यासह बाहेरही या देखाव्याची प्रचंड ख्याती पसरली.कारगिल चौकाचे नामकरण व कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ स्थापन करण्याकरिता शहरातील नागरिक उदय धकाते, प्रकाश भांडेकर, हिरालाल बिश्वास, विजय पिल्ले, नरेंद्र चन्नावार, गणेश नंदनवार, सुभाष माधमशेट्टीवार, मोतीराम हजारे, श्रावण कापगते, अनिल तेलंग, बाळासाहेब पद्मावार, डॉ.बिडकर, मोबिन सय्यद, सुशील देशमुख, सोनिया बैस, रेवनाथ गोवर्धन, किशोर सोनटक्के यांनी पुढाकार घेतला. नागरिकांमध्ये देशभक्ती, देशप्रेम व बलिदानाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.कारगिलच्या नावावर चौक व मंडळ स्थापनकारगिल युद्धाच्या विजयानंतर आलेल्या पहिल्याच दुर्गा उत्सवात युद्धातील देखाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने दुर्गा उत्सव मंडळाने उत्सव स्थळ व परिसराला कारगिल चौक नाव देण्याचे ठरविले. याकरिता रितसर नगर परिषदेची परवानगीही घेतली. त्यानुसार चंद्रपूर मार्गावरील आठवडी बाजार परिसराला कारगिल चौक हे नाव देण्यात आले. केवळ चौकालाच नाव न देता दुर्गा उत्सव मंडळाचेही नामकरण कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ करण्यात आले. चौकस्थळी केवळ एक बोर्ड लावण्यात आला आहे. कारगिल विजयासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यासाठी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. नवरात्र उत्सवात मंडळातर्फे विविध स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना बक्षीसांचे वितरण केले जाते. तसेच दरवर्षी कारगिल विजय दिन उत्साहात साजरा केला जातो.

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन