शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

सात महिन्यांचे मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:06 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देरोहयो कर्मचारी संकटात : २ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. या कामांचा हिशेब व इतर कार्यालयीन कामे करण्यासाठी एकूण ११ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना तांत्रिक पॅनल अधिकारी असे संबोधल्या जाते. या कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर २०१७ पासून आजपर्यंत मानधनच झाले नाही. तर एपीओ व सीडीपीओ कर्मचाºयांना फेब्रुवारी २०१८ ते आतापर्यंत चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही.कंत्राटी कर्मचाऱ्यांना अगोदरच कमी मानधन दिले जाते. त्यातही ते वेळेवर दिले जात नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे. मानधन देण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. वारंवार चर्चा सुद्धा केली. मात्र मानधन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. दोन दिवसात मानधन न दिल्यास २ जूनपासून कार्यालयात बेमुदत लेखनीबंद आंदोलन करू व या कालावधीत होणाऱ्या कार्यालयीन कामाच्या विलंबास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर बी.के. राऊत, व्ही.सी. भेडके, आर.व्ही. निकोडे, ए.एम. खेवले, व्ही.ए. मारगे, एस.एन. मडावी, एन.जे. राजगडे, व्ही.सी. सिडाम, व्ही.आर. सहारे, एस.एस. नंदागौरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो यांना पाठविले आहेत.तुटपुंजे मानधनरोहयो कर्मचाºयांना नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. या मानधनातच संपूर्ण खर्च भागवावा लागतो. त्यामुळे रोहयो कर्मचारी आर्थिकदृष्ट्या खंगले आहेत. अनेकांनी तर मानधन परवडत नसल्याच्या कारणावरून नोकरीला राजीनामा दिला आहे. मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.