शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

सात महिन्यांचे मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:06 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देरोहयो कर्मचारी संकटात : २ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. या कामांचा हिशेब व इतर कार्यालयीन कामे करण्यासाठी एकूण ११ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना तांत्रिक पॅनल अधिकारी असे संबोधल्या जाते. या कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर २०१७ पासून आजपर्यंत मानधनच झाले नाही. तर एपीओ व सीडीपीओ कर्मचाºयांना फेब्रुवारी २०१८ ते आतापर्यंत चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही.कंत्राटी कर्मचाऱ्यांना अगोदरच कमी मानधन दिले जाते. त्यातही ते वेळेवर दिले जात नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे. मानधन देण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. वारंवार चर्चा सुद्धा केली. मात्र मानधन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. दोन दिवसात मानधन न दिल्यास २ जूनपासून कार्यालयात बेमुदत लेखनीबंद आंदोलन करू व या कालावधीत होणाऱ्या कार्यालयीन कामाच्या विलंबास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर बी.के. राऊत, व्ही.सी. भेडके, आर.व्ही. निकोडे, ए.एम. खेवले, व्ही.ए. मारगे, एस.एन. मडावी, एन.जे. राजगडे, व्ही.सी. सिडाम, व्ही.आर. सहारे, एस.एस. नंदागौरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो यांना पाठविले आहेत.तुटपुंजे मानधनरोहयो कर्मचाºयांना नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. या मानधनातच संपूर्ण खर्च भागवावा लागतो. त्यामुळे रोहयो कर्मचारी आर्थिकदृष्ट्या खंगले आहेत. अनेकांनी तर मानधन परवडत नसल्याच्या कारणावरून नोकरीला राजीनामा दिला आहे. मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.