शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

सात महिन्यांचे मानधन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:06 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

ठळक मुद्देरोहयो कर्मचारी संकटात : २ जूनपासून आंदोलन करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे सदर कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून आंदोलन करण्याचा इशारा धानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. या कामांचा हिशेब व इतर कार्यालयीन कामे करण्यासाठी एकूण ११ कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना तांत्रिक पॅनल अधिकारी असे संबोधल्या जाते. या कर्मचाऱ्यांची नोव्हेंबर २०१७ पासून आजपर्यंत मानधनच झाले नाही. तर एपीओ व सीडीपीओ कर्मचाºयांना फेब्रुवारी २०१८ ते आतापर्यंत चार महिन्यांचे मानधन मिळाले नाही.कंत्राटी कर्मचाऱ्यांना अगोदरच कमी मानधन दिले जाते. त्यातही ते वेळेवर दिले जात नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची पाळी आली आहे. मानधन देण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. वारंवार चर्चा सुद्धा केली. मात्र मानधन मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. दोन दिवसात मानधन न दिल्यास २ जूनपासून कार्यालयात बेमुदत लेखनीबंद आंदोलन करू व या कालावधीत होणाऱ्या कार्यालयीन कामाच्या विलंबास प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर बी.के. राऊत, व्ही.सी. भेडके, आर.व्ही. निकोडे, ए.एम. खेवले, व्ही.ए. मारगे, एस.एन. मडावी, एन.जे. राजगडे, व्ही.सी. सिडाम, व्ही.आर. सहारे, एस.एस. नंदागौरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो यांना पाठविले आहेत.तुटपुंजे मानधनरोहयो कर्मचाºयांना नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय तुटपुंजे मानधन दिले जाते. या मानधनातच संपूर्ण खर्च भागवावा लागतो. त्यामुळे रोहयो कर्मचारी आर्थिकदृष्ट्या खंगले आहेत. अनेकांनी तर मानधन परवडत नसल्याच्या कारणावरून नोकरीला राजीनामा दिला आहे. मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.