शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

टिल्लूपंप जप्ती मोहीम सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 10:26 PM

गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती मोहीम एजंसीमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर उपाययोजना : निविदा काढून एजंसीला काम देणार; पालिकेच्या हालचाली वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरानजीकच्या वैनगंगा नदीची पाणीपातळी दरवर्षीच्या उन्हाळ्यात खालावत असल्याने शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. दरम्यान उन्हाळ्यात पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सदर टिल्लू पंप जप्ती मोहीम एजंसीमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली आहे.पालिकेच्या वतीने टिल्लू पंप जप्ती मोहिम शहरात राबविण्यासाठी निविदा प्रक्रिया बोलावून एजंसीची निवड करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पालिका प्रशासनाने गतीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर काम एजंसीला देण्यात यावे, असा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यापूर्वीच घेण्यात आला आहे.गडचिरोली शहरात एकूण १२ प्रभाग असून २५ वॉर्ड आहेत. पालिकेची नळ पाणीपुरवठ योजना वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर कार्यान्वित करण्यात आली आहे. शहरात जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले असून नदीपात्रात इनटेक वेल व नदीच्या वर मोठी टाकी बसविण्यात आले आहेत. याशिवाय बोरमाळा मार्गावर पालिकेने जलशुद्धीकरण केंद्र बसविले आहे.शहरातील रामनगर, गणेशनगर तसेच विसापूर, विसापूर टोलीसह काही भाग चढ आहे. दरवर्षीच्या उन्हाळ्यात वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावत असल्याने नळ योजनेच्या इनटेक वेलमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात येत नाही. शिवाय पाणी टाकीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी येत नाही. त्यामुळे शहराच्या बऱ्याच भागात नळाद्वारे पाणी पोहोचत नाही. अशा स्थितीतही शहराच्या बºयाच भागात वरच्या मजल्यावर अनेक नागरिक टिल्लू पंप लावून पाणी खेचतात. परिणामी अनेक नळधारकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही.सध्यास्थितीत शहरातील गणेशनगर, रामनगर, विसापूर, विसापूर टोली, स्नेहनगर व इतर काही वॉर्डात पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे. नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे गेल्या महिनाभरापासून केवळ सकाळच्या सुमारास एकदाच नळाला पाणी सोडले जात आहे. गडचिरोली शहरात पालिकेने बसविलेली नळ पाईपलाईन ही खुप जुनी असून सदोष आहे. त्यामुळे नळाद्वारे पाण्याचे असमान वितरण होत आहे. या समस्येला मार्गी लावण्यासाठी आता पालिकेच्या वतीने एजंसीमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्यात येणार आहे. ज्या नळधारकाच्या घरी नळाला टिल्लू पंप लावून पाणी खेचत असल्याचे दिसून आल्यास संबंधित नळधारकाकडून प्रत्येकी दोन हजार रूपयांचे दंड आकारण्यात येणार आहे. यातील जवळपास निम्मी रक्कम संबंधित एजंसीला मिळणार आहे.गतवर्षी ७० टिल्लू पंप जप्तगतवर्षीच्या उन्हाळ्यात मार्च महिन्यापासूनच नगर पालिकेच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम राबविण्यात आली. दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत पालिकेच्या वतीने गतवर्षी जवळपास ७० टिल्लू पंप जप्त करून संंबंधित टिल्लू पंपधारकावर दोन हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. यापैकी अनेकांनी दंडाची रक्कम भरून आपले टिल्लू पंप सोडविले नाही. यावर्षीही अनेक वॉर्डात आत्तापासूनच नळाला पाणी येत नसल्याच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीची दखल घेऊन मुख्याधिकाºयांनी एजंसीमार्फत टिल्लू पंप जप्ती मोहिम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहिम एप्रिल अखेर सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.