शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

‘त्या’ वाघाला जेरबंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:16 IST

तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. आरमोरी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. आरमोरी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.पट्टेदार वाघाच्या दहशतीने आरमोरी तालुका पुन्हा हादरला आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक नजीकच्या जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसºयाकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेºयात ट्रॅप झाले आहे. वाघाच्या धुमाकुळामुळे आरमोरी परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहे. या समस्येची दखल घेऊन आ.कृष्णा गजबे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.आरमोरी भागात पट्टेदार वाघ धुमाकूळ घालित असल्याने नागरिक भयभित झाले असून ही समस्या गंभीर बनली आहे, असे आ.गजबे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगितले. सदर विषयावर त्यांनी मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घकाळ चर्चा केली.निवेदनात आ.गजबे यांनी म्हटले आहे की, आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आरमोरी तालुक्यात पुनश्च वाघाचा संचार असल्याचे निदर्शनास आले आहे. २८ नोव्हेंबर रोजी आरमोरी नगर परिषदलगतच्या रामपूर येथे वनविभागाने लावलेल्या ट्रॅपिंग कॅमेºयामध्ये गायीला ठार केल्याचे क्षण दिसत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरमोरी तालुक्यातील चुरमुरा येथील मागील १५ दिवसांपूर्वी वाघाने एका व्यक्तीवर हल्ला करून जखमी केले. त्यामुळे वाघाला तातडीने जेरबंद करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी आ.गजबे यांनी केली आहे.भीतीमुळे शेतीची कामे बंदआरमोरी परिसरात शेतीची कामे जोमात सुरू आहेत. खरीपाची धान कापणी, बांधणी तसेच रब्बी हंगामातील पीक लागवडीचे काम सुरू आहे. मात्र या भागात वाघाची दहशत निर्माण झाल्याने शेतकºयांनी आता शेतावर जाऊन काम करणे बंद झाले आहे. ये-जा करणाºया विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :TigerवाघSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार