शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

तहानलेले अस्वल शंकरपुरात दाखल

By admin | Updated: May 26, 2016 02:27 IST

२५ मे च्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे पाण्याच्या शोधात भटकलेली हिंस्त्र अस्वल चक्क दारात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली.

गावकरी झाले भयभीत : नागरिकांच्या दारांवर पाण्यासाठी फिरलीविसोरा : २५ मे च्या पहाटे ५ वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे पाण्याच्या शोधात भटकलेली हिंस्त्र अस्वल चक्क दारात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. उष्णता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. जंगलातील तसेच गावानजीकचे जलसाठे कोरडे झाल्याने वन्यजीवांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकावे लागत आहे. वडसा-कुरखेडा मार्गावर स्थित शंकरपूर येथील चंद्रमणी लाडे यांच्या घरी बुधवारी पहाटे ४.३० ते ५ वाजताच्या दरम्यान अस्वलीचे आगमन झाले. हे कळताच ते घाबरून गेले परंतु हिमतीने त्यांनी तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करताच ती शेजारील घरच्या बाथरुममध्ये घुसली तेव्हापर्यंत आजूबाजूचे नागरिक गोळा होऊन आरडाओरड करताच अस्वलीने नामदेव मेश्राम यांच्या घरी प्रवेश केला. अखेर पाण्याने व्याकूळ अस्वल मेश्रामच्या घरी पाणी पिऊन घराजवळील रस्ता ओलांडताच शेतातून जंगलाच्या दिशेने पळाली. जंगलात पाण्याचा अंशच उरला नसल्याने तहानलेली अस्वल मानवी वस्तीत आल्याचे दिसून येत आहे. घरातील अस्वल आगमनाने कसलीही जीवित वा वित्त हानी झाली नसली, तरी भविष्यात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शंकरपूर, डोंगरमेंढा, कसारीच्या वनांतील पाणीसाठे आटल्याने या परीसरात प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. वन विभागाने जंगलातील जलसाठे भरण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे वन विभागावर रोष आहे. (वार्ताहर)