शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मणपूर दारूबळी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:37 IST

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यांनी त्याच दिवशी मतदारांना दारूचे प्रलोभन देणारे ...

दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. त्यांनी त्याच दिवशी मतदारांना दारूचे प्रलोभन देणारे मोरेश्वर गोवर्धन आणि जमकीदास मेश्राम (दोघेही रा. मुरदोली चक) या दोन उमेदवारांसह गुलाबदास देशमुख अशा तीन आरोपींना अटक करून पीसीआर मिळविला. याशिवाय गावात दारू पोहोचवून देणाऱ्या तिघांनाही आता अटक झाली. हे तिघे राममोहनपूर, कालीनगर आणि सुभाषनगर येथील आहेत.

दारू विषारी झाली कशी?

या प्रकरणात मतदारांना वाटप करण्यात आलेली हातभट्टीची दारू विषारी झाली कशी, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे येऊन ठेपले आहे. ज्या ठिकाणी ही दारू गाळल्या गेली त्या ठिकाणावरून इतरही काही ठिकाणी दारूचा पुरवठा झाला होता. पण लक्ष्मणपूरमध्येच दारू घेणाऱ्या लोकांना विषबाधा झाली. त्यामुळे दारूची आयात करणाऱ्यांकडून किंवा गावात साठवून ठेवली त्यावेळी दारूला तीव्र करण्यासाठी त्यात काही रासायनिक पदार्थ मिसळल्या गेले आणि त्यातून रासायनिक प्रक्रिया होऊन ती दारू विषयुक्त झाली असण्याची शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीनेही तपास करीत आहेत.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

विषारी दारूचे वाटप करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. तसेच दोन्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाखाची तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना एक लाखाची मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

हातभट्ट्या झाल्या अनियंत्रित

(फोटो- भट्टी)

जिल्ह्याच्या चामोर्शी, गडचिरोली, धानोरा, आरमोरी, अहेरी तालुक्यात हातभट्ट्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोहफुलासोबत गाळ्या गुळाचा वापर त्यासाठी केला जातो. दारूला अधिक तीव्र करण्यासाठी मिसळल्या जाणाऱ्या पदार्थांचा शरीरावर घातक परिणाम होतो. त्यातूनच लक्ष्मणपूरसारख्या घटना घडतात. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी हातभट्ट्यांवरील कारवाया वाढविण्याची गरज आहे. पण सध्या तरी त्याबाबत अनेक पोलीस ठाणे आणि उत्पादन शुल्क विभाग कानाडोळा करताना दिसत आहे.