शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

तीन महिन्यांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:48 IST

शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचे काम करणाऱ्या अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : शापोआ कर्मचाऱ्यांच्या पंचायत समितीत येरझाराअहेरी : शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शिजवून वाढण्याचे काम करणाऱ्या अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासूनचे मानधन रखडले आहे. सदर मानधन मिळावे, याकरिता शापोआ कर्मचारी वारंवार पंचायत समितीला येरझारा मारत आहेत. मात्र त्यांचे मानधन निकाली काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.अहेरी तालुक्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून रखडल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांचे मानधन तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. सोमवारी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालय गाठून तीन महिन्यांच्या मानधनाविषयी विचारणा केली असता, आमच्याकडे मानधन व इंधन खर्च उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आम्ही बँकेला डीडी पाठविला नाही, असे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम नियमित करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनियमित मानधन दिले जाते. शासनस्तरावरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून रखडलेले मानधन तत्काळ निकाली काढून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष भिमन्ना तालावार, तालुका सचिव गणेश चापले, कार्याध्यक्ष किशोर मडावी, कर्मचारी कोडापे, मंदा मांडरे, शकुंतला गुरनुले यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)