शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

तीन एकरात फुलविली केळीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:38 IST

शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे.

ठळक मुद्देपारंपरिक व निर्वाहाच्या शेतीला बगल : बोडधाच्या शेतकºयाची उद्योगी शेती इतरांसाठी प्रेरणादायी

गोपाल लाजूरकर।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे. याचेच एक अनोखे उदाहरण म्हणजे, आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरातील बोडधा गावचे शेतकरी तथा पोलीस पाटील शंकरराव संभाजी जवादे. शंकरराव जवादे यांनी तीन एकर शेतीत केळी लागवड करून इतरांना उद्योगी शेतीचा एक नवीन मूलमंत्र दिला आहे.शेतकरी शंकरराव जवादे यांना कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ९ एकरच्या शेतीच्या तुकड्यात तीन एकरावर जानेवारी २०१७ मध्ये केळीची लावगड केली. तीन एकरासाठी केळीचे जी-९ टिशू कल्चरल वाण जळगाव येथून बोलाविले. ३ हजार ५०० रोपांची शेतीत लागवड केली. मशागतीसह लागवडीकरिता त्यांना जवळपास ३ लाख रूपयांवर खर्च आला. केळीच्या बागेनजीक बोअरद्वारे पाण्याची व्यवस्था केली. झाडांना पाणी करण्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. याकरिता त्यांना बराचसा पैसा खर्च करावा लागला. रोपांच्या सभोवताल चारही बाजूंनी शेवरी जातींची झाडे लावली आहेत. सध्या ही झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली असून याद्वारे वादळ वाºयापासून केळीचे संरक्षण होत आहे. साडेतीन हजार झाडांपैैकी सध्या केळीची ३ हजार १५० झाडे जीवंत आहेत. १० महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबरपर्यंत केळीचे पीक निघणार आहे. यातून त्यांना २ लाख रूपये निव्वळ नफा अपेक्षित आहे. शंकरराव जवादे यांचे सुपुत्र सचिन जवादे हे या बागेची नियमित निगा राखत आहेत. तोट्याची शेती म्हणून शेतकºयांनी हताश न होता उद्योगी शेतीकडे वळावे, असे ते आनंदाने सांगतात.केळी पिकाची मशागत व देखभालकेळी पिकासाठी शेतकरी जवादे यांनी तीन एकराच्या जागेचे सपाटीकरण ट्रॅक्टरमार्फत केले. त्यानंतर तीन एकरात दहा ट्रॅक्टर शेणखत टाकून रोटावेटरने माती बारीक केली. एक ते दीड फूट उंच उभ्या पाळी तयार केल्या. त्यानंतर ५ बाय ५.५ फुटावर केळीची छोटी रोपे लावली. यावेळी बुरशीनाशकाचा वापर केला. उन्हाळ्यात चार दिवसाआड पाणी दिले. तसेच पोटॅश, युरिया, मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा, विद्राव्य खते नियमित दिली. त्यानंतर लागवडीपासून सात ते साडेसात महिन्यात केळीला घड आले. तीन एकरातील बागेत कचºयाची काढणी करण्यापासून ते रोपट्यांची निगा राखण्याचे काम शेतकरी कुटुंब करीत आहे.शेतकरी अद्यापही पारंपरिक शेतीच्या जोखडातून बाहेर पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक अथवा निर्वाहाची शेती तोट्याची आहे. त्यामुळे शेतकºयांनी व्यावसायिक शेतीकडे वळल्यास आर्थिक नफा अधिक मिळू शकतो. परंतु याकरिता पैेसा व मेहनतीचीही जोड आवश्यक आहे.- शंकरराव जवादे, शेतकरी तथा पोलीस पाटील, बोडधा