शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन एकरात फुलविली केळीची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:38 IST

शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे.

ठळक मुद्देपारंपरिक व निर्वाहाच्या शेतीला बगल : बोडधाच्या शेतकºयाची उद्योगी शेती इतरांसाठी प्रेरणादायी

गोपाल लाजूरकर।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शेती व्यवसाय तोट्याचा म्हणून याकडे बहुतांश शेतकरी पाठ फिरवित असले तरी महत्त्वाकांक्षा, जिद्द व मेहनतीच्या बळावर शेतकरी तोट्यातील शेतीला आर्थिक उन्नतीचे साधन बनवू पाहत आहे. याचेच एक अनोखे उदाहरण म्हणजे, आरमोरी तालुक्याच्या वडधा परिसरातील बोडधा गावचे शेतकरी तथा पोलीस पाटील शंकरराव संभाजी जवादे. शंकरराव जवादे यांनी तीन एकर शेतीत केळी लागवड करून इतरांना उद्योगी शेतीचा एक नवीन मूलमंत्र दिला आहे.शेतकरी शंकरराव जवादे यांना कृषी विभागाच्या अधिकाºयांकडून प्रेरणा मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ९ एकरच्या शेतीच्या तुकड्यात तीन एकरावर जानेवारी २०१७ मध्ये केळीची लावगड केली. तीन एकरासाठी केळीचे जी-९ टिशू कल्चरल वाण जळगाव येथून बोलाविले. ३ हजार ५०० रोपांची शेतीत लागवड केली. मशागतीसह लागवडीकरिता त्यांना जवळपास ३ लाख रूपयांवर खर्च आला. केळीच्या बागेनजीक बोअरद्वारे पाण्याची व्यवस्था केली. झाडांना पाणी करण्याकरिता त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. याकरिता त्यांना बराचसा पैसा खर्च करावा लागला. रोपांच्या सभोवताल चारही बाजूंनी शेवरी जातींची झाडे लावली आहेत. सध्या ही झाडे १५ ते २० फुटापर्यंत वाढली असून याद्वारे वादळ वाºयापासून केळीचे संरक्षण होत आहे. साडेतीन हजार झाडांपैैकी सध्या केळीची ३ हजार १५० झाडे जीवंत आहेत. १० महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच डिसेंबरपर्यंत केळीचे पीक निघणार आहे. यातून त्यांना २ लाख रूपये निव्वळ नफा अपेक्षित आहे. शंकरराव जवादे यांचे सुपुत्र सचिन जवादे हे या बागेची नियमित निगा राखत आहेत. तोट्याची शेती म्हणून शेतकºयांनी हताश न होता उद्योगी शेतीकडे वळावे, असे ते आनंदाने सांगतात.केळी पिकाची मशागत व देखभालकेळी पिकासाठी शेतकरी जवादे यांनी तीन एकराच्या जागेचे सपाटीकरण ट्रॅक्टरमार्फत केले. त्यानंतर तीन एकरात दहा ट्रॅक्टर शेणखत टाकून रोटावेटरने माती बारीक केली. एक ते दीड फूट उंच उभ्या पाळी तयार केल्या. त्यानंतर ५ बाय ५.५ फुटावर केळीची छोटी रोपे लावली. यावेळी बुरशीनाशकाचा वापर केला. उन्हाळ्यात चार दिवसाआड पाणी दिले. तसेच पोटॅश, युरिया, मॅग्नेशियम सल्फेटची मात्रा, विद्राव्य खते नियमित दिली. त्यानंतर लागवडीपासून सात ते साडेसात महिन्यात केळीला घड आले. तीन एकरातील बागेत कचºयाची काढणी करण्यापासून ते रोपट्यांची निगा राखण्याचे काम शेतकरी कुटुंब करीत आहे.शेतकरी अद्यापही पारंपरिक शेतीच्या जोखडातून बाहेर पडला नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पारंपरिक अथवा निर्वाहाची शेती तोट्याची आहे. त्यामुळे शेतकºयांनी व्यावसायिक शेतीकडे वळल्यास आर्थिक नफा अधिक मिळू शकतो. परंतु याकरिता पैेसा व मेहनतीचीही जोड आवश्यक आहे.- शंकरराव जवादे, शेतकरी तथा पोलीस पाटील, बोडधा