शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राेजगारासाठी हजाराे मजुरांची माेठ्या शहरांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:57 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जारावंडी : एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी परिसरात स्थानिक पातळीवर काेणत्याही प्रकारचा राेजगार सध्या उपलब्ध नसल्याने या भागातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जारावंडी : एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी परिसरात स्थानिक पातळीवर काेणत्याही प्रकारचा राेजगार सध्या उपलब्ध नसल्याने या भागातील हजाराे नागरिकांनी पाेटाची खळगी भरण्यासाठी माेठ्या शहरात धाव घेतली आहे. अनेकांनी जिल्ह्याबाहेर स्थलांतर केले असून काही मजूर कामासाठी जाण्याच्या तयारीत आहेत.

केंद्र सरकारने २००५ मध्ये राेजगार हमी कायदा लागू करून राेजगार हमी याेजना अस्तित्वात आणली. मात्र, प्रशासनाच्या नियाेजनशून्यतेमुळे ‘राेहयाे’तून या भागातील मजुरांना राेजगार मिळत नसल्याचे दिसून येते. एटापल्ली तालुक्याच्या शेवटच्या टाेकावर छत्तीसगड सीमेला लागून जारावंडी परिसर आहे. या परिसरात जवळपास ९ ग्रामपंचायती असून २५ हजारांच्या आसपास लाेकसंख्या आहे. या भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक समस्या कायम आहे. या परिसरातील आदिवासी व बिगर आदिवासीबांधव हाताला काम नाही म्हणून जिल्ह्याच्या बाहेर माेठ्या शहरात तात्पुरता स्थलांतरित हाेत आहे. परिणामी गावखेडे ओस पडत आहेत. यावर्षी धानाचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांना जाेरदार फटका बसला. शेती व बांधकामाव्यतिरिक्त इतर काेणतेही व्यवसाय व राेजगार जारावंडी भागात उपलब्ध नाही. शेतीची कामे आटाेपली असल्याने अनेक जण शहराकडे कामासाठी धाव घेत आहेत. आपल्या मुला-मुलींसह स्थलांतरीत हाेत असल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

बाॅक्स

या शहरांकडे धाव

कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी जारावंडी परिसरातील नागरिक अंगमेहनतीची कामे करतात. शेती व माेलमजुरीचे काम करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करतात. मात्र, आता शेतीची व मजुरीची कामे आटाेपल्याने हात रिकामे आहेत. त्यामुळे या भागातील मजूर नागपूर, मुंबई, चेन्नई, पुणे, हैदराबाद या शहरात कामाच्या शाेधात जात असल्याचे दिसून येते. नेहमी गजबजून राहणारे या परिसरातील सात ते आठ गावे आता ओस पडल्याचे दिसून येत आहे.