शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

‘त्या’ ५० विद्यार्थ्यांची माऊली हरपली

By admin | Updated: February 20, 2015 01:04 IST

अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते,...

गडचिरोली : अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते, अशा ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना पुण्यात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची सोय पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी करून दिली. आबांच्या अकाली जाण्याने आपली माऊली हरपली, याचे दु:ख या विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर आमच्या मुलाच्या मातीच्या गोळ्याला आबांनी परिसाचा स्पर्श करून त्याचे सोने केले, ही भावना एटापल्ली येथील मनोहर भगवान बोरकर या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. जानेवारी २०१० पासून गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी कामाला सुरूवात केली होती. ५ आॅगस्ट २०११ ला जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील ५० विद्यार्थ्यांना पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकसेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित सुभाषचंद्र बोस सैनिकी व इंग्रजी माध्यम विद्यालय फुलगाव पुणे येथे शिक्षणाला पाठविण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीसारख्या मागास भागात राहून ज्यांच्या वाट्याला सदैव दारिद्र्याचे जीणे आले होते, अशा असंख्य पालकांसाठी आपला मुलगा, मुलगी पुण्याला शिक्षणाला जाणार ही बातमी आनंदाला उधाण आणणारी होती. आर. आर. पाटील यांच्या रूपाने पालकांसाठी देवदूतच धावून आला होता. यातीच एटापल्ली येथील एक पालक व सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोरकर यांनी १ मे २०११ रोजी आर. आर. पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञतेची भावना कळविली. या पत्राला ९ मे २०११ ला उलट टपाली उत्तरही गृहमंत्री असलेल्या आबांनी वेळ काढून धाडले होते. या पत्रात आर. आर. पाटील यांनी ज्या भागाचा विकास झाला आहे, समृध्द झाला आहे, अशा ठिकाणी जाऊन काम करायला सगळे तयार असतात. मात्र अविकसित, मागास आणि आदिवासी क्षेत्रात जाऊन मनासारखे काम करता यावे. खरी सामाजिक बांधिलकी जपता यावी, यासाठी मी जाणीवपूर्वक गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. प्रश्न अनेक असले तरी त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. यात आपल्या सारख्यांचा मिळणारा पाठींबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असून ते आपण सुरू केले आहेत, अशी भावना आबांनी व्यक्त केली होती. गडचिरोली जिल्ह्यातून पुण्यात गेलेली ही मुले कसे शिक्षण घेत आहे हे दाखविण्यासाठी गडचिरोलीच्या पत्रकारांना तेथे आबांनी पाठविले होते. आज आबा आपल्यात नाहीत. ते अकाली निघून गेलेत. पुणे येथे गेलेले गडचिरोलीचे सारे विद्यार्थी आपण पोरके झालो, अशी भावना व्यक्त करीत आहेत. पुणे येथे शिकणाऱ्या यशस्वी मनोहर बोरकर या विद्यार्थिनीच्या पालकांनी आबामुळे आमच्या मुलांचे परिसाच्या स्पर्शाने मातीचे सोने व्हावे, तसे झाले आहे, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.