शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

‘त्या’ ५० विद्यार्थ्यांची माऊली हरपली

By admin | Updated: February 20, 2015 01:04 IST

अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते,...

गडचिरोली : अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते, अशा ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना पुण्यात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची सोय पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी करून दिली. आबांच्या अकाली जाण्याने आपली माऊली हरपली, याचे दु:ख या विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर आमच्या मुलाच्या मातीच्या गोळ्याला आबांनी परिसाचा स्पर्श करून त्याचे सोने केले, ही भावना एटापल्ली येथील मनोहर भगवान बोरकर या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. जानेवारी २०१० पासून गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी कामाला सुरूवात केली होती. ५ आॅगस्ट २०११ ला जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील ५० विद्यार्थ्यांना पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकसेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित सुभाषचंद्र बोस सैनिकी व इंग्रजी माध्यम विद्यालय फुलगाव पुणे येथे शिक्षणाला पाठविण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीसारख्या मागास भागात राहून ज्यांच्या वाट्याला सदैव दारिद्र्याचे जीणे आले होते, अशा असंख्य पालकांसाठी आपला मुलगा, मुलगी पुण्याला शिक्षणाला जाणार ही बातमी आनंदाला उधाण आणणारी होती. आर. आर. पाटील यांच्या रूपाने पालकांसाठी देवदूतच धावून आला होता. यातीच एटापल्ली येथील एक पालक व सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोरकर यांनी १ मे २०११ रोजी आर. आर. पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञतेची भावना कळविली. या पत्राला ९ मे २०११ ला उलट टपाली उत्तरही गृहमंत्री असलेल्या आबांनी वेळ काढून धाडले होते. या पत्रात आर. आर. पाटील यांनी ज्या भागाचा विकास झाला आहे, समृध्द झाला आहे, अशा ठिकाणी जाऊन काम करायला सगळे तयार असतात. मात्र अविकसित, मागास आणि आदिवासी क्षेत्रात जाऊन मनासारखे काम करता यावे. खरी सामाजिक बांधिलकी जपता यावी, यासाठी मी जाणीवपूर्वक गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. प्रश्न अनेक असले तरी त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. यात आपल्या सारख्यांचा मिळणारा पाठींबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असून ते आपण सुरू केले आहेत, अशी भावना आबांनी व्यक्त केली होती. गडचिरोली जिल्ह्यातून पुण्यात गेलेली ही मुले कसे शिक्षण घेत आहे हे दाखविण्यासाठी गडचिरोलीच्या पत्रकारांना तेथे आबांनी पाठविले होते. आज आबा आपल्यात नाहीत. ते अकाली निघून गेलेत. पुणे येथे गेलेले गडचिरोलीचे सारे विद्यार्थी आपण पोरके झालो, अशी भावना व्यक्त करीत आहेत. पुणे येथे शिकणाऱ्या यशस्वी मनोहर बोरकर या विद्यार्थिनीच्या पालकांनी आबामुळे आमच्या मुलांचे परिसाच्या स्पर्शाने मातीचे सोने व्हावे, तसे झाले आहे, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.