शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ५० विद्यार्थ्यांची माऊली हरपली

By admin | Updated: February 20, 2015 01:04 IST

अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते,...

गडचिरोली : अतिशय दुर्गम भागात राहून ज्यांनी कधी गावातल्याही शाळेत शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहिले नसते. कंदमुळे खाऊन कसे तरी जीवन जगणे त्यांच्या वाट्याला आले असते, अशा ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना पुण्यात नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षणाची सोय पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी करून दिली. आबांच्या अकाली जाण्याने आपली माऊली हरपली, याचे दु:ख या विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर आमच्या मुलाच्या मातीच्या गोळ्याला आबांनी परिसाचा स्पर्श करून त्याचे सोने केले, ही भावना एटापल्ली येथील मनोहर भगवान बोरकर या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. जानेवारी २०१० पासून गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून आर. आर. पाटील यांनी कामाला सुरूवात केली होती. ५ आॅगस्ट २०११ ला जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील ५० विद्यार्थ्यांना पालकमंत्री आर. आर. पाटील यांनी लोकसेवा प्रतिष्ठानद्वारा संचालित सुभाषचंद्र बोस सैनिकी व इंग्रजी माध्यम विद्यालय फुलगाव पुणे येथे शिक्षणाला पाठविण्याचा निर्णय घेतला. गडचिरोलीसारख्या मागास भागात राहून ज्यांच्या वाट्याला सदैव दारिद्र्याचे जीणे आले होते, अशा असंख्य पालकांसाठी आपला मुलगा, मुलगी पुण्याला शिक्षणाला जाणार ही बातमी आनंदाला उधाण आणणारी होती. आर. आर. पाटील यांच्या रूपाने पालकांसाठी देवदूतच धावून आला होता. यातीच एटापल्ली येथील एक पालक व सामाजिक कार्यकर्ते मनोहर बोरकर यांनी १ मे २०११ रोजी आर. आर. पाटील यांना पत्र लिहून त्यांच्या उपक्रमाबद्दल कृतज्ञतेची भावना कळविली. या पत्राला ९ मे २०११ ला उलट टपाली उत्तरही गृहमंत्री असलेल्या आबांनी वेळ काढून धाडले होते. या पत्रात आर. आर. पाटील यांनी ज्या भागाचा विकास झाला आहे, समृध्द झाला आहे, अशा ठिकाणी जाऊन काम करायला सगळे तयार असतात. मात्र अविकसित, मागास आणि आदिवासी क्षेत्रात जाऊन मनासारखे काम करता यावे. खरी सामाजिक बांधिलकी जपता यावी, यासाठी मी जाणीवपूर्वक गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. प्रश्न अनेक असले तरी त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला आहे. यात आपल्या सारख्यांचा मिळणारा पाठींबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज असून ते आपण सुरू केले आहेत, अशी भावना आबांनी व्यक्त केली होती. गडचिरोली जिल्ह्यातून पुण्यात गेलेली ही मुले कसे शिक्षण घेत आहे हे दाखविण्यासाठी गडचिरोलीच्या पत्रकारांना तेथे आबांनी पाठविले होते. आज आबा आपल्यात नाहीत. ते अकाली निघून गेलेत. पुणे येथे गेलेले गडचिरोलीचे सारे विद्यार्थी आपण पोरके झालो, अशी भावना व्यक्त करीत आहेत. पुणे येथे शिकणाऱ्या यशस्वी मनोहर बोरकर या विद्यार्थिनीच्या पालकांनी आबामुळे आमच्या मुलांचे परिसाच्या स्पर्शाने मातीचे सोने व्हावे, तसे झाले आहे, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.