शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गळतीच्या पाण्यावर भागवितात तहान

By admin | Updated: May 14, 2015 01:22 IST

येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे.

वैरागड : येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. अनेक तांत्रिक त्रुटी असल्यामुळे गावात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी अनेक नागरिकांना गळतीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे वास्तविक चित्र वैरागडात पहायला मिळत आहे. जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा असमान पुरवठा सुरू आहे. काही वार्डात नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही तर अनेक ठिकाणी नळाला पिण्यायोग्य पाणी येत नाही. यामुळे नळ योजनेच्या विहिरीजवळील पाईपलाईनच्या गळतीवर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. २६ जानेवारी २०१३ च्या ग्रामसभेत उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, नवीन पाणीपुरवठा योजना येथील नदीच्या गोरजाई डोहावर कार्यान्वित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव तत्काळ पेयजल पाणीपुरवठा यंत्रणेकडे पाठविण्याबाबत ग्रामसभेने सूचित केले होते. मात्र स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने नळ पाणीपुरवठा योजनेचा ठराव पेयजल विभागाकडे पाठविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लावला. राष्ट्रीय पेयजल उपविभाग कुरखेडा कार्यालयाच्या अभियंत्याने गावाच्या औद्योगिक व ऐतिहासिक पार्श्वभूमिचा विचार करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार केला व सदर कृती आराखडा वैरागड ग्राम पंचायत प्रशासनाला पाठविला अशी माहिती आहे. दरम्यान वैरागड ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने नव्या नळ योजनेची प्रशासकीय मान्यता थांबून होती. वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ व भोयर यांच्या घरानजीकच्या ग्राम पंचायतीच्या मोकळ्या जागेत वाढीव दोन जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. मात्र नळयोजनेच्या विहिरीला जलस्त्रोत कमी असल्याने गावातील पाणीटंचाईची समस्या कायम राहिली. नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात नदीपात्रात शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने या शिवकालीन बंधाऱ्याचा पाणीटंचाईच्या समस्येवर काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे वैरागड गावात गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. (वार्ताहर)