शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गळतीच्या पाण्यावर भागवितात तहान

By admin | Updated: May 14, 2015 01:22 IST

येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे.

वैरागड : येथील २५ ते ३० वर्षांपूर्वीची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या लोकसंख्येला कमी पडत आहे. अनेक तांत्रिक त्रुटी असल्यामुळे गावात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. परिणामी अनेक नागरिकांना गळतीच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचे वास्तविक चित्र वैरागडात पहायला मिळत आहे. जुन्या नळ पाणीपुरवठा योजनेत अनेक तांत्रिक अडचणी आहेत. त्यामुळे गावात पाण्याचा असमान पुरवठा सुरू आहे. काही वार्डात नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नाही तर अनेक ठिकाणी नळाला पिण्यायोग्य पाणी येत नाही. यामुळे नळ योजनेच्या विहिरीजवळील पाईपलाईनच्या गळतीवर गावकऱ्यांना तहान भागवावी लागत आहे. २६ जानेवारी २०१३ च्या ग्रामसभेत उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, नवीन पाणीपुरवठा योजना येथील नदीच्या गोरजाई डोहावर कार्यान्वित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सदर ठराव तत्काळ पेयजल पाणीपुरवठा यंत्रणेकडे पाठविण्याबाबत ग्रामसभेने सूचित केले होते. मात्र स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाने नळ पाणीपुरवठा योजनेचा ठराव पेयजल विभागाकडे पाठविण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लावला. राष्ट्रीय पेयजल उपविभाग कुरखेडा कार्यालयाच्या अभियंत्याने गावाच्या औद्योगिक व ऐतिहासिक पार्श्वभूमिचा विचार करून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार केला व सदर कृती आराखडा वैरागड ग्राम पंचायत प्रशासनाला पाठविला अशी माहिती आहे. दरम्यान वैरागड ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने नव्या नळ योजनेची प्रशासकीय मान्यता थांबून होती. वैरागड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ व भोयर यांच्या घरानजीकच्या ग्राम पंचायतीच्या मोकळ्या जागेत वाढीव दोन जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. मात्र नळयोजनेच्या विहिरीला जलस्त्रोत कमी असल्याने गावातील पाणीटंचाईची समस्या कायम राहिली. नळ योजनेच्या विहिरीच्या खालील भागात नदीपात्रात शिवकालीन बंधारा बांधण्यात आला. मात्र सदर बंधाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने या शिवकालीन बंधाऱ्याचा पाणीटंचाईच्या समस्येवर काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे वैरागड गावात गेल्या महिनाभरापासून नागरिकांना पाणीटंचाई समस्या भेडसावत आहे. (वार्ताहर)