शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

दराची गाववासीयांची भागणार तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:56 IST

छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या दराची गावात पाण्याची तीव्र टंचाई होती. गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या गावात ठक्करबापा आदिवासी सुधार योजनेतून विहीर मंजूर करण्यात आली असून या विहिरीचे खोदकाम सुरू झाले आहे.

ठळक मुद्देविहिरीचे खोदकाम सुरू : गावाजवळच्या खड्ड्याचे प्यावे लागत होते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या दराची गावात पाण्याची तीव्र टंचाई होती. गावकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या गावात ठक्करबापा आदिवासी सुधार योजनेतून विहीर मंजूर करण्यात आली असून या विहिरीचे खोदकाम सुरू झाले आहे.दराची हे गाव कुरखेडा-कोरची तालुक्याच्या सीमेवर आहे. जवळपास २०० लोकसंख्या असलेल्या गावात विहीर नव्हती. त्यामुळे येथील नागरिक तिन्ही ऋतुत गावालगत असलेल्या १० ते १५ फूट खोल खड्ड्यातील पाणी काढून पित होते. उन्हाळ्यामध्ये सदर खड्डा आटत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती. पावसाळ्यात खड्ड्याचे पाणी पिल्यामुळे विविध आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत होते. गावामध्ये विहिरीचे बांधकाम होणे आवश्यक होते. ही बाब सचिव मोहन माकडे, सरपंच नरोटे यांनी जिल्हा परिषद सदस्य लता पुंगाटी यांच्या लक्षात आणून दिली. पुंगाटी यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून ठक्करबापा योजनेतून विहीर मंजूर करायला लावली. मागील चार दिवसांपासून या ठिकाणी विहिरीचे खोदकाम पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने सुरू झाले आहे. काम अतिशय गतीने सुरू असल्याने ते लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या विहिरीमुळे गावातील नागरिकांना पहिल्यांदाच शुद्ध पाणी पिण्यास मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.गावाजवळील खड्डा अतिशय धोकादायक होता. खड्ड्याच्या मध्यभागी लाकडे टाकून त्यावर उभे राहून महिलांना पाणी काढावे लागत होते. एखाद्या वेळेस महिलेचा पाय घसरल्यास जीवितहानी होण्याची शक्यता होती. विहिरीचे बांधकाम झाल्यानंतर या खड्ड्यातून पाणी भरण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.