शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘ते’ १३ वीज खांब देताहेत अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:16 IST

आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राष्ट्रीय महामार्गावरील तीन खांब तुटले; रात्रीच्या सुमारास धोक्याची शक्यता

विलास चिलबुले ।लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : आरमोरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अनेक विद्युत खांब रस्त्यावर असल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रीय महामार्गावर १३ विद्युत खांब असून हे खांब अपघातास निमंत्रण देत आहेत. मात्र या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.आरमोरी शहरात राष्ट्रीय महामार्गावरील बर्डी टी-पार्इंट ते नवीन बसस्थानक, स्टेट बँकेजवळ, भगतसिंग चौक तसेच बँक आॅफ इंडियाजवळ, जुना बसस्थानक, संत जगनाडे महाराज चौक ते साई मंदिरपर्यंत १३ विद्युत खांब अपघातास आमंत्रण देत आहेत. बर्डी ते साई मंदिर या परिसरातून राष्ट्रीय महामार्गावरून ओव्हरलोड ट्रक, महामंडळाच्या बसगाड्या, खासगी बसगाड्या तसेच लहान-मोठे मिळून दररोज शेकडो वाहने आवागमन करीत असतात. वाहनाच्या धडकेमुळे या मार्गावरील तीन खांब तुटले आहेत. अपघातामुळे उर्वरित खांब तुटण्याच्या मार्गावर आहेत.वीज खांबांमुळे भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येकडे महावितरण व स्थानिक नगर परिषद प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर आलेल्या या खांबांमुळे रस्ता अरूंद होत असून वाहनधारकांना आवागमन करताना या खांबांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडत आहेत.लोकमतने या समस्येबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने दोन ते तीनच वीज खांब रस्त्यावरून हटवून इतरत्र लावण्यात आले. यापूर्वी रात्री ट्रकच्या अपघातामुळे तीन खांब तुटले. मात्र यात जीवितहानी झाली नाहीप्रशासकीय यंत्रणा आंधळीआरमोरी शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध अनेक वीज खांब आहेत. हे खांब सर्व नागरिकांना दिसतात. मात्र प्रशासनाला दिसत नाही का, असा प्रश्न शहरातील नागरिकांपुढे उपस्थित होत आहे. अद्यापही १३ वीज खांब मार्गावर कायम असल्याने प्रशासकीय यंत्रणा आंधळी झाल्याचे वाटत आहे.येत्या सहा महिन्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार असल्यामुळे त्यांच्या मार्फत सदर खांब हटविण्यात येणार आहेत. मात्र जे खांब रस्त्याच्या मध्ये आलेले आहेत, असे खांब हटविण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणकडे संपर्क करून मार्गदर्शन घेण्यात येईल. शहराच्या मुख्य मार्गावरील वीज खांब हटविण्यात येईल.- हैदरभाई पंजवानी, उपाध्यक्ष, नगर परिषद, आरमोरी

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग