शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी जिल्ह्यात 50 चालक हाेणार रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : येत्या आठ दिवसात गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध हाेणार आहेत. यातील बहुतांश चालकांच्या मदतीने मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर हाेणार असली तरी सामान्य प्रवाशांचे हाल मात्र अजुनही कायम आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे. गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील काही चालक साेमवारी रुजू हाेणार आहेत. 

जिल्हाधिकारी आग्रही-    बसअभावी विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार एसटी प्रशासन सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बस सुरू करणार आहे. 

वाहकांचे काय? चालक रुजू हाेणार असले तरी वाहकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे काही एसटीच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर वाहकाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव विकास मिशनच्या बसेसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींकडे पास राहते. त्यामुळे त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करण्याची गरज पडत नाही. परिणामी वाहकाशिवाय बसेस चालविता येणार आहेत. 

सामान्य नागरिकांचे हाल सुरूच एसटीचा संप लांबतच चालला आहे. जुने कर्मचारी कामावर रुजू हाेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. शासनाने चालकांप्रमाणेच वाहकांचीही नियुक्ती करावी. जाहिरात काढल्यास लाखाे बेराेजगार एसटीत नाेकरी करतील. चालक भरतीबराेबरच आता वाहकांची भरती सुध्दा करावी लागणार आहे.

२२ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे लक्ष एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. १८ फेब्रुवारीला अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीला यावर सुनावणी हाेणार आहे. अहवालात काय म्हटले आहे, सुनावणीदरम्यान निकाल लागणार काय, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

५० चालक देण्याचे पत्र प्राप्तगडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून देण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. साेमवारपासून काही चालक रूजू हाेतील. या चालकांच्या मदतने सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या जातील.- अशाेककुमार वाडीभस्मे, विभागीय नियंत्रक, गडचिराेली

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप