शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवासासाठी जिल्ह्यात 50 चालक हाेणार रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : येत्या आठ दिवसात गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध हाेणार आहेत. यातील बहुतांश चालकांच्या मदतीने मानव विकास मिशनच्या बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर हाेणार असली तरी सामान्य प्रवाशांचे हाल मात्र अजुनही कायम आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी शासनाने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या आहेत. बससेवा उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थिनींनी दूरवरच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने शाळेत येण्याची समस्या निर्माण झाली आहे. बस उपलब्ध नसल्याने काही विद्यार्थिनींनी शाळेत जाणे बंद केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनावर ताेडगा म्हणून एसटी व्यवस्थापन खासगी एजन्सीमार्फत एसटी चालकांची नियुक्ती करीत आहे. गडचिराेली विभागाला ५० चालक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातील काही चालक साेमवारी रुजू हाेणार आहेत. 

जिल्हाधिकारी आग्रही-    बसअभावी विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस सुरू करण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी संजय मिना यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार एसटी प्रशासन सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बस सुरू करणार आहे. 

वाहकांचे काय? चालक रुजू हाेणार असले तरी वाहकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे काही एसटीच्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर वाहकाची जबाबदारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानव विकास मिशनच्या बसेसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींकडे पास राहते. त्यामुळे त्यांच्याकडून तिकिटाचे पैसे वसूल करण्याची गरज पडत नाही. परिणामी वाहकाशिवाय बसेस चालविता येणार आहेत. 

सामान्य नागरिकांचे हाल सुरूच एसटीचा संप लांबतच चालला आहे. जुने कर्मचारी कामावर रुजू हाेण्यास तयार नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल सुरू आहेत. शासनाने चालकांप्रमाणेच वाहकांचीही नियुक्ती करावी. जाहिरात काढल्यास लाखाे बेराेजगार एसटीत नाेकरी करतील. चालक भरतीबराेबरच आता वाहकांची भरती सुध्दा करावी लागणार आहे.

२२ फेब्रुवारीच्या सुनावणीकडे लक्ष एसटीचे शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. १८ फेब्रुवारीला अहवाल सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे. त्यानंतर २२ फेब्रुवारीला यावर सुनावणी हाेणार आहे. अहवालात काय म्हटले आहे, सुनावणीदरम्यान निकाल लागणार काय, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

५० चालक देण्याचे पत्र प्राप्तगडचिराेली विभागाला ५० कंत्राटी चालक उपलब्ध करून देण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. साेमवारपासून काही चालक रूजू हाेतील. या चालकांच्या मदतने सर्वप्रथम मानव विकास मिशनच्या बसेस सुरू केल्या जातील.- अशाेककुमार वाडीभस्मे, विभागीय नियंत्रक, गडचिराेली

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप