शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

गडचिरोली जिल्ह्यातील ४५ पूल झाले कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:11 IST

दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, वाढलेली वर्दळ पाहता सध्या गडचिरोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेले ४५ पूल आता कुचकामी ठरत आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यात तुटतो गावांचा संपर्क पुनर्बांधणीसाठी २२७ कोटींची गरज

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, वाढलेली वर्दळ पाहता सध्या गडचिरोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेले ४५ पूल आता कुचकामी ठरत आहेत. पावसाळ्यात हे सर्व पूल पाण्याखाली जाऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सद्यस्थितीत २२७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.जिल्ह्यातील अनेक पूल ठेंगणे आहेत. पावसाळ्यात नद्यांना पूर आला किंवा त्या दुथडी भरून वाहू लागल्या तरी हे पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे भामरागड, धानोरा, अहेरी, आरमोरी तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून मोठी समस्या निर्माण होते. काही पुलांचे अ‍ॅप्रोच मार्गच वाहून गेले आहेत. त्यामुळे चारचाकी वाहन पैलतिरावर जाऊ शकत नाही. गंभीर अवस्थेत अनेक रुग्णांना गावातच जीव सोडावा लागतो. हे टाळण्यासाठी १४ मोठ्या आणि ३१ लहान पुलांची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे.परंतु त्यासाठी लागणाऱ्या २२७ कोटी रुपयांच्या खर्चाची सोय कोण करणार? हा प्रश्न उभा ठाकला आहे.बांधकाम विभागाच्या आराखड्यानुसार मोठ्या १४ पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १८६ कोटी रुपयांची तर ३१ लहान पुलांच्या पुनर्बांधणीसाठी ४१.२५ कोटी रुपयांची गरज आहे. नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून व जिल्हा निधीतून रस्ते व पुलांच्या कामांसाठी किती निधी उपलब्ध केला जातो, हे पाहून त्यानुसार प्राधान्यक्रमाने कोणती कामे घ्यायची हे ठरविण्यात येणार आहे.या ४५ पुलांमध्ये सर्व चारही विधानसभा मतदार संघांच्या आमदारांनी प्रस्तावित केलेले आणि नक्षलविरोधी अभियान सुरळीतपणे राबविण्यासाठी पोलीस विभागाने प्रस्तावित केलेले काही पूल आहेत.

योजनांसाठी कोट्यवधी, सुविधांसाठी नाहीगडचिरोली जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नक्षल समस्येवर विकास हाच तोडगा असल्याचे सांगितले जाते. पण रस्ते व पुलासारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना मात्र केंद्र व राज्य शासन हात आखडता घेत आहे. परिणामी नागरिकांना विविध समस्यांला तोंड द्यावे लागते.

पर्लकोटावरील पुलासाठी ५५ कोटींची गरजभामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे पाणी यावर्षी गावात शिरून हाहाकार उडाला होता. या नदीवरील पूल ठेंगणाच नाही तर अरुंदही आहे. जवळपास २०० मीटर लांबीच्या या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याशिवाय आलापल्ली-भामरागड रस्त्यावर बांडिया नदीवरील पुलासाठी ३५ कोटी तर याच रस्त्यावर पेरमिली नाल्यावरील पुलासाठी २० कोटींचा खर्च येणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा