शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

गडचिरोली जिल्ह्यातील ४५ पूल झाले कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 11:11 IST

दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, वाढलेली वर्दळ पाहता सध्या गडचिरोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेले ४५ पूल आता कुचकामी ठरत आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यात तुटतो गावांचा संपर्क पुनर्बांधणीसाठी २२७ कोटींची गरज

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसेंदिवस वाढत असलेली लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, वाढलेली वर्दळ पाहता सध्या गडचिरोली जिल्ह्यात अस्तित्वात असलेले ४५ पूल आता कुचकामी ठरत आहेत. पावसाळ्यात हे सर्व पूल पाण्याखाली जाऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी सद्यस्थितीत २२७ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.जिल्ह्यातील अनेक पूल ठेंगणे आहेत. पावसाळ्यात नद्यांना पूर आला किंवा त्या दुथडी भरून वाहू लागल्या तरी हे पूल पाण्याखाली जातात. त्यामुळे भामरागड, धानोरा, अहेरी, आरमोरी तालुक्यासह इतर तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटून मोठी समस्या निर्माण होते. काही पुलांचे अ‍ॅप्रोच मार्गच वाहून गेले आहेत. त्यामुळे चारचाकी वाहन पैलतिरावर जाऊ शकत नाही. गंभीर अवस्थेत अनेक रुग्णांना गावातच जीव सोडावा लागतो. हे टाळण्यासाठी १४ मोठ्या आणि ३१ लहान पुलांची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे.परंतु त्यासाठी लागणाऱ्या २२७ कोटी रुपयांच्या खर्चाची सोय कोण करणार? हा प्रश्न उभा ठाकला आहे.बांधकाम विभागाच्या आराखड्यानुसार मोठ्या १४ पुलांच्या पुनर्बांधणीसाठी १८६ कोटी रुपयांची तर ३१ लहान पुलांच्या पुनर्बांधणीसाठी ४१.२५ कोटी रुपयांची गरज आहे. नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाकडून व जिल्हा निधीतून रस्ते व पुलांच्या कामांसाठी किती निधी उपलब्ध केला जातो, हे पाहून त्यानुसार प्राधान्यक्रमाने कोणती कामे घ्यायची हे ठरविण्यात येणार आहे.या ४५ पुलांमध्ये सर्व चारही विधानसभा मतदार संघांच्या आमदारांनी प्रस्तावित केलेले आणि नक्षलविरोधी अभियान सुरळीतपणे राबविण्यासाठी पोलीस विभागाने प्रस्तावित केलेले काही पूल आहेत.

योजनांसाठी कोट्यवधी, सुविधांसाठी नाहीगडचिरोली जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नक्षल समस्येवर विकास हाच तोडगा असल्याचे सांगितले जाते. पण रस्ते व पुलासारख्या मूलभूत सुविधांसाठी निधी देताना मात्र केंद्र व राज्य शासन हात आखडता घेत आहे. परिणामी नागरिकांना विविध समस्यांला तोंड द्यावे लागते.

पर्लकोटावरील पुलासाठी ५५ कोटींची गरजभामरागडलगत असलेल्या पर्लकोटा नदीवरील पुलाचे पाणी यावर्षी गावात शिरून हाहाकार उडाला होता. या नदीवरील पूल ठेंगणाच नाही तर अरुंदही आहे. जवळपास २०० मीटर लांबीच्या या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. याशिवाय आलापल्ली-भामरागड रस्त्यावर बांडिया नदीवरील पुलासाठी ३५ कोटी तर याच रस्त्यावर पेरमिली नाल्यावरील पुलासाठी २० कोटींचा खर्च येणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा