शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी लागली चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 01:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा, कुरूड, येनापूर व आलापल्ली पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे.

जुन्या सरकारचे काम : भाजपकडूनही पाठपुराव्याचा दावागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा, कुरूड, येनापूर व आलापल्ली पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात चढाओढ सुरू असल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा परिषदेवर सत्ता असताना चामोर्शी तालुक्यातील तीन पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तसेच आलापल्ली भागातील पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यामुळे या पाणी पुरवठा योजनांना आपल्यामुळे मंजुरी मिळाल्याचा दावा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम हलगेकर यांनी केला आहे. तर या सर्व योजना चामोर्शी तालुक्यातील होत्या. त्यावेळच्या येथील जिल्हा परिषद सदस्य प्रतीभा गद्देवार, विजया विठ्ठलानी व अतुल गण्यारपवार यांनी या योजनांसाठी शासनाकडेही पाठपुरावा केला होता, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. मात्र त्यावेळी या योजनांसाठी निधी मंजूर झालेला नव्हता. यांचे प्रस्ताव राज्य सरकारकडे गेलेले होते. आता मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून या पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे व त्यांच्या कामाची निविदाही निघाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपल्यामुळेच हे काम झाले, असा दावा करीत आहेत. काँग्रेस वगळता राकाँ व भाजप, गण्यारपवार समर्थकांनी या पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीत आपले श्रेय असल्याचे दावा केल्याने लोकांचे मनोरंजन होत आहे. किमान आता तरी या पाणी पुरवठा योजनेचे काम तत्काळ मार्गी लागावे, अशी आशा सर्वसामान्यांनी व्यक्त केली आहे. आलापल्लीसाठी ९ कोटी १३ लाख, कुनघाडा रै. साठी ५ कोटी ११ लाख, येनापूरसाठी ८ कोटी ६४ लाख व कुरूडसाठी ८ कोटी २९ लाखांची योजना मंजूर करण्यात आली आहे. या संदर्भात बोलताना विद्यमान जि.प. सदस्य अतुल गण्यारपवार यांनी त्यावेळी या योजना लहान व कमी गावांच्या होत्या. यातील गावांची संख्या वाढवून या योजनांना फिल्टर प्लॅन्टही करण्याबाबत आपणच पुढाकार घेतला होता व यासाठी प्रस्तावही तयार केले होते. गद्देवार, विठ्ठलानी यांचेही या कामात श्रेय आहे, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.(जिल्हा प्रतिनिधी)