शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

९० ग्रा.पं.मध्ये कामेच नाही

By admin | Updated: February 28, 2016 01:38 IST

जिल्हाभरातील एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३६७ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे काम सुरू झाले असून सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये अजूनही कामाला सुरुवात झाली नाही.

रोहयो कामे रखडली : मजुरांचे स्थानांतरण वेगाने सुरूगडचिरोली : जिल्हाभरातील एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३६७ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे काम सुरू झाले असून सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. विशेष म्हणजे या ग्रामपंचायती दुर्गम भागातील असल्याने नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचा हंगाम संपल्यानंतर अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांच्या हाताला कोणतेही काम राहत नाही. त्यामुळे या नागरिकांना बेरोजगारीचे जीवन जगावे लागते. परिणामी सदर नागरिक रोजगाराच्या शोधात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यासह छत्तीसगड व तेलंगणा राज्यात निघून जातात. शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराची समस्या निर्माण होते. ही देशपातळीवरीलच समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली.धानपिकाचा हंगाम संपल्यानंतर रोहयो कामांची मागणी वाढते. रोहयो विभागाच्या २० फेब्रुवारीच्या अहवालानुसार एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी ३६७ ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू आहे. मात्र सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरू नाही. यंत्रणास्तर व ग्रामपंचायतस्तरावर जिल्हाभरात सुमारे ६२ हजार ४४७ मजूर काम करीत आहेत. गावातील मजूर रोहयो कामांची मागणी करतात. मात्र निधी नाही, कामाला मंजुरी नाही, अशा प्रकारचे विविध कारणे दाखवून प्रशासन नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले. काही ग्रामपंचायतीमध्ये तर रोजगार मागण्याचा अर्जसुद्धा स्वीकारला जात नाही. गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. येथील नागरिक रोजगारासाठी भटकत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)