शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

९० ग्रा.पं.मध्ये कामेच नाही

By admin | Updated: February 28, 2016 01:38 IST

जिल्हाभरातील एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३६७ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे काम सुरू झाले असून सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये अजूनही कामाला सुरुवात झाली नाही.

रोहयो कामे रखडली : मजुरांचे स्थानांतरण वेगाने सुरूगडचिरोली : जिल्हाभरातील एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी केवळ ३६७ ग्रामपंचायतींमध्ये रोहयोचे काम सुरू झाले असून सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. विशेष म्हणजे या ग्रामपंचायती दुर्गम भागातील असल्याने नागरिकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाचा हंगाम संपल्यानंतर अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांच्या हाताला कोणतेही काम राहत नाही. त्यामुळे या नागरिकांना बेरोजगारीचे जीवन जगावे लागते. परिणामी सदर नागरिक रोजगाराच्या शोधात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यासह छत्तीसगड व तेलंगणा राज्यात निघून जातात. शेतीचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराची समस्या निर्माण होते. ही देशपातळीवरीलच समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली.धानपिकाचा हंगाम संपल्यानंतर रोहयो कामांची मागणी वाढते. रोहयो विभागाच्या २० फेब्रुवारीच्या अहवालानुसार एकूण ४५७ ग्रामपंचायतींपैकी ३६७ ग्रामपंचायतीमध्ये काम सुरू आहे. मात्र सुमारे ९० ग्रामपंचायतीमध्ये एकही काम सुरू नाही. यंत्रणास्तर व ग्रामपंचायतस्तरावर जिल्हाभरात सुमारे ६२ हजार ४४७ मजूर काम करीत आहेत. गावातील मजूर रोहयो कामांची मागणी करतात. मात्र निधी नाही, कामाला मंजुरी नाही, अशा प्रकारचे विविध कारणे दाखवून प्रशासन नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले. काही ग्रामपंचायतीमध्ये तर रोजगार मागण्याचा अर्जसुद्धा स्वीकारला जात नाही. गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. येथील नागरिक रोजगारासाठी भटकत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)